शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By शोभना कांबळे | Updated: March 1, 2023 15:23 IST

गेल्या ५३ वर्षात ॲल्युमिनियम प्रकल्प उभारण्यात आला नाही

रत्नागिरी : ॲल्युमिनियम (BALCO) कारखान्यांसाठी नजीकच्या शिरगाव येथील सुमारे ८३० शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमीन संपादित  करण्यात आल्या. मात्र, १९७० सालापासून त्यावर प्रकल्प न करता या जागा खासगी कंपन्यांना देण्यात आल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून या शेतकऱ्यांना त्यांच्या जागा परत द्याव्यात अथवा त्यांना नवीन दरानुसार त्याचा मोबदला मिळावा, यासाठी आक्रमक झालेल्या नजिकच्या शिरगाव आणि परिसरातील अल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन केले. यात सुमारे १५० शेतकरी सहभागी झाले होते.झाडगाव म्युनिसिपल हद्दीच्या आतील आणिबाहेरील तसेच शिरगाव ग्रामपंचायतीतील काही शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी घेण्यात आल्या. १९७० सालापासून आत्तापर्यंत या जमिनीत कोणताही कारखाना कुठल्याच सरकारने आणला नाही. ही जमीन पडीक अवस्थेत आहे. गेल्या ५३ वर्षात ॲल्युमिनियम प्रकल्प उभारण्यात आला नाही. त्यामुळे  हे शेतकरी ५३ वर्षे उत्पन्नापासून वंचित राहिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणे नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात.

संपादित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना काही कारणास्तव परत करता येत नसतील तर या जागेचा चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, अशी मागणी ॲल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र, या मागणीची दखल आतापर्यंत सरकारने न घेतल्याने या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा दिवस धरणे आंदोलन केले.यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांंचीही शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना या मागणीचे निवेदनही दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपण हे निवेदन एमआयडीसीकडे वर्ग करू तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही दिली.जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देताना ॲल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाचे राजन आयरे, प्रसन्न दामले, चंद्रशेखर नातोंडकर, उमेश खंडकर, सलील डाफळे यादी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरीagitationआंदोलन