जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर झाला कमी, जिल्ह्यात २४८ कोरोनाबाधित नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:22+5:302021-07-17T04:25:22+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात नव्याने २४७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या ६७,९७६ झाली आहे. तर केवळ ५९ ...

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर झाला कमी, जिल्ह्यात २४८ कोरोनाबाधित नवे रुग्ण
रत्नागिरी : जिल्ह्यात नव्याने २४७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या ६७,९७६ झाली आहे. तर केवळ ५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण ६२,३९८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. कोरोनाने ९ रुग्णांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत एकूण १,९३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाला असून, तो ५.७१ टक्क्यांवर आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असली, तरी बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्हाभरात ४,३२९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे असून, मंडणगडात ३ रुग्ण, दापोलीत ३४, खेडमध्ये २५, गुहागरात ८, चिपळुणात ५३, संगमेश्वरात २६, रत्नागिरीत ७५, लांजात ११ आणि राजापुरात १२ रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी तालुक्याचा पॉझिटिव्हिटी दर नेहमीच इतर तालुक्यांपेक्षा जास्त होता. मात्र, त्यामध्ये घट झाली असून, तो ६.७६ टक्के झाला आहे तर दापोलीच्या पॉझिटिव्हिटी दरात वाढ झाली असून, तो ११.६४ टक्के झाला आहे.
जिल्ह्यात एकूण ९ रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये मागील दिवसातील ६ मृतांचा समावेश आहे. या मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ३ रुग्ण, दापोलीतील २ आणि खेड, चिपळूण, लांजा, राजापूर या तालुक्यांमधील प्रत्येकी एक रुग्ण आहे. बाधित रुग्णांचा मृत्यूदर २.८७ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९१.६९ टक्के आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण ३,००६ आहेत.