शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

रत्नागिरीत पोषण आहारात निकृष्ट धान्य; ठेकेदारांवर गुन्हा नोंदवा, पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 19:15 IST

‘नाम’च्या माध्यमातून गाळ काढण्याची मोहीम हाती घ्या

रत्नागिरी : शासनाच्या विविध निर्णयांची कोटेकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडीसेविका प्रामाणिकपणे करीत असतात. त्यांच्यामुळेच शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि यशस्वी होतात. अशा अंगणवाडीताईंच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, असे सांगतानाच शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.अंगणवाडीसेविकांच्या अडचणींसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.पालकमंत्री सामंत म्हणाले, अंगणवाडीसेविकांवर अन्याय होणार नाहीत, याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. त्यांना नाहक त्रास होईल, असे निर्णय जिल्हास्तरावर होता कामा नये. त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या जिल्ह्याची भौगोलिक रचना, येथील धार्मिक सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरविले असेल तर त्याचे खापर तसेच सगळा रोष अंगणवाडीसेविकांवर येतो. याची तपासणी करून अशा निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत.नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी. त्याबाबतचा प्रस्ताव महसूल यंत्रणेशी चर्चा करून करावा. रिक्त पदांसाठी नवीन भरती करत असताना पूर्वीच्या एकाही अंगणवाडीसेविकांना काढून टाकले जाणार नाही, असे पालकमंत्री सामंत म्हणाले.

‘नाम’च्या माध्यमातून गाळ काढण्याची मोहीम हाती घ्याजिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भातही पालकमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, जलसंधारण, जलसंपदा आणि यांत्रिकी विभागाने नद्यातील गाळ काढण्याच्या संदर्भात नियोजन करावे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नद्यांमधील गाळ काढावा. वाशिष्टी नदीसाठी साडेसात कोटी मंजूर आहेत. त्याचे काम सुरू करा. धामणसे येथेही गाळ काढण्याबाबत सुरुवात करावी. अन्य ठिकाणचा आराखडा तयार करावा. नाम फाउंडेशनही यंत्रणा राबवून गाळ काढण्याच्या कामकाजाला सुरुवात करावी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीguardian ministerपालक मंत्रीUday Samantउदय सामंत