शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण फिरतंय शिवसेना, भाजपभोवतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 11:18 IST

Politics Shiv Sena BJP Ratnagiri ग्रामपंचायत निवडणुका संपल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली आहे. सध्या संघटनात्मक स्तरावर शिवसेना आणि भाजपकडूनच हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलांमुळे शिवसेनेत आणि विरोधी पक्ष असल्याने भाजपमध्ये थोड्याफार घडामोडी घडत आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघातच विकास कामांच्या कार्यक्रमानिमित्ताने आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी थोडी चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे कमालीची शांतता आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी चिपळूण, संगमेश्वरात कार्यरत काँग्रेस नेहमीप्रमाणे शांतच

मनोज मुळ्येरत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुका संपल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली आहे. सध्या संघटनात्मक स्तरावर शिवसेना आणि भाजपकडूनच हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलांमुळे शिवसेनेत आणि विरोधी पक्ष असल्याने भाजपमध्ये थोड्याफार घडामोडी घडत आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघातच विकास कामांच्या कार्यक्रमानिमित्ताने आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी थोडी चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे कमालीची शांतता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुळातच राजकीय कुरघोडींबाबत शांत आहे. केवळ निवडणुका आल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये काहीतरी हालचाली सुरू होतात. त्याखेरीज इतर काळात राजकीय पक्षांमध्ये सारे काही शांत शांतच असते. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका आणि त्यापाठोपाठ फेब्रुवारीमध्ये सरपंच निवडणुका होताना राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ सुरू होती. त्यातही शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीनच पक्षांत अधिक हालचाली होत्या.आता त्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय स्तरावरील हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय स्तरावर शांतता आहे.शिवसेनाजिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या निमित्ताने शिवसेनेत काही ना काही हालचाल होत आहे. पदासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. त्यातही अध्यक्ष पदासाठी अनेक दावेदार असल्याने कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. बराच काळ मागे पडलेले उदय बने आता पुढे आले आहेत. खेड आणि रत्नागिरीत चढाओढ लागली आहे. सध्या तरी हे शीतयुद्ध आहे; पण त्यामुळे संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि सभापती निवडीत आमदारही उत्सुक असले तरी वरिष्ठांकडून अजून कोणतेही संकेत नाहीत.भाजपविरोधी पक्षाच्या भूमिकेत असल्याने भाजपने शिवसेनेवर सतत वार करणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे भाजपमध्येही हालचाली होत आहेत. कामगार आघाडी असेल किंवा माजी खासदार नीलेश राणे यांची आक्रमक भूमिका असेल, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भाजपही आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले नसले तरी शिवसेनेला निर्भेळ आनंद मिळू नये, इतके यश भाजपने मिळवले. त्यातूनही भाजपमधील उत्साह वाढला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसपक्षीयदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालीही मंदावलेल्याच आहेत. उदय सामंत आणि भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर पक्षाची ताकद खूपच कमी झाली आहे. या दोघांकडे एकतर पद होते आणि त्यात या दोघांचाही कार्यकर्त्यांमधील वैयक्तिक संपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते नेले आहेत. केवळ शेखर निकम हे एकटेच राष्ट्रवादीकडून किल्ला लढवत आहेत. विकास कामांच्या माध्यमातून ते सतत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात फिरत असतात. हीच राष्ट्रवादीची भक्कम बाजू आहे.जिल्हाध्यक्ष हटाव मोहिमेखेरीज काँग्रेसमध्ये शांतताचमाजी खासदार हुसेन दलवाई यांचा अधेमधे होणारा दौरा आणि यात त्यांनी भाजपवर केलेली टीका वगळता काँग्रेसमध्येही पक्षीय पातळीवर पूर्ण शांतता आहे. जिल्हाध्यक्ष हटाव हा काँग्रेसचा पारंपरिक नारा अधूनमधून पुढे येतो. हा नारा राष्ट्रवादी स्वतंत्र होण्याआधीपासूनचा कायम आहे. तो केवळ काँग्रेसमध्येच मोठ्या प्रमाणात टिकून राहिला आहे. संघटनात्मक वाढ असेल किंवा कामांच्या माध्यमातून लोकांसमोर जाण्याबाबत काँग्रेसचे प्रगतीपुस्तक अजून कोरेच आहे. सत्तेत असलेला काँग्रेसचा सहभाग जिल्ह्यात कोठेच दिसत नाही. सत्ता नसतानाही हुस्नबानू खलिफे यांनी केलेले प्रयत्न आता सत्ता असतानाही इतरांकडून होत नाहीत.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी