शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण फिरतंय शिवसेना, भाजपभोवतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 11:18 IST

Politics Shiv Sena BJP Ratnagiri ग्रामपंचायत निवडणुका संपल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली आहे. सध्या संघटनात्मक स्तरावर शिवसेना आणि भाजपकडूनच हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलांमुळे शिवसेनेत आणि विरोधी पक्ष असल्याने भाजपमध्ये थोड्याफार घडामोडी घडत आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघातच विकास कामांच्या कार्यक्रमानिमित्ताने आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी थोडी चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे कमालीची शांतता आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी चिपळूण, संगमेश्वरात कार्यरत काँग्रेस नेहमीप्रमाणे शांतच

मनोज मुळ्येरत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुका संपल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली आहे. सध्या संघटनात्मक स्तरावर शिवसेना आणि भाजपकडूनच हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलांमुळे शिवसेनेत आणि विरोधी पक्ष असल्याने भाजपमध्ये थोड्याफार घडामोडी घडत आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघातच विकास कामांच्या कार्यक्रमानिमित्ताने आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी थोडी चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे कमालीची शांतता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुळातच राजकीय कुरघोडींबाबत शांत आहे. केवळ निवडणुका आल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये काहीतरी हालचाली सुरू होतात. त्याखेरीज इतर काळात राजकीय पक्षांमध्ये सारे काही शांत शांतच असते. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका आणि त्यापाठोपाठ फेब्रुवारीमध्ये सरपंच निवडणुका होताना राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ सुरू होती. त्यातही शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीनच पक्षांत अधिक हालचाली होत्या.आता त्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय स्तरावरील हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय स्तरावर शांतता आहे.शिवसेनाजिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या निमित्ताने शिवसेनेत काही ना काही हालचाल होत आहे. पदासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. त्यातही अध्यक्ष पदासाठी अनेक दावेदार असल्याने कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. बराच काळ मागे पडलेले उदय बने आता पुढे आले आहेत. खेड आणि रत्नागिरीत चढाओढ लागली आहे. सध्या तरी हे शीतयुद्ध आहे; पण त्यामुळे संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि सभापती निवडीत आमदारही उत्सुक असले तरी वरिष्ठांकडून अजून कोणतेही संकेत नाहीत.भाजपविरोधी पक्षाच्या भूमिकेत असल्याने भाजपने शिवसेनेवर सतत वार करणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे भाजपमध्येही हालचाली होत आहेत. कामगार आघाडी असेल किंवा माजी खासदार नीलेश राणे यांची आक्रमक भूमिका असेल, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भाजपही आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले नसले तरी शिवसेनेला निर्भेळ आनंद मिळू नये, इतके यश भाजपने मिळवले. त्यातूनही भाजपमधील उत्साह वाढला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसपक्षीयदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालीही मंदावलेल्याच आहेत. उदय सामंत आणि भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर पक्षाची ताकद खूपच कमी झाली आहे. या दोघांकडे एकतर पद होते आणि त्यात या दोघांचाही कार्यकर्त्यांमधील वैयक्तिक संपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते नेले आहेत. केवळ शेखर निकम हे एकटेच राष्ट्रवादीकडून किल्ला लढवत आहेत. विकास कामांच्या माध्यमातून ते सतत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात फिरत असतात. हीच राष्ट्रवादीची भक्कम बाजू आहे.जिल्हाध्यक्ष हटाव मोहिमेखेरीज काँग्रेसमध्ये शांतताचमाजी खासदार हुसेन दलवाई यांचा अधेमधे होणारा दौरा आणि यात त्यांनी भाजपवर केलेली टीका वगळता काँग्रेसमध्येही पक्षीय पातळीवर पूर्ण शांतता आहे. जिल्हाध्यक्ष हटाव हा काँग्रेसचा पारंपरिक नारा अधूनमधून पुढे येतो. हा नारा राष्ट्रवादी स्वतंत्र होण्याआधीपासूनचा कायम आहे. तो केवळ काँग्रेसमध्येच मोठ्या प्रमाणात टिकून राहिला आहे. संघटनात्मक वाढ असेल किंवा कामांच्या माध्यमातून लोकांसमोर जाण्याबाबत काँग्रेसचे प्रगतीपुस्तक अजून कोरेच आहे. सत्तेत असलेला काँग्रेसचा सहभाग जिल्ह्यात कोठेच दिसत नाही. सत्ता नसतानाही हुस्नबानू खलिफे यांनी केलेले प्रयत्न आता सत्ता असतानाही इतरांकडून होत नाहीत.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी