शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

पोलीस व्हायचं होतं.. अपघातस्थळावर हादरले पोलीसही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 10:32 IST

अवजड ट्रक चार दुचाकींना ठोकर देऊन उलटला आणि त्यातील कोळसा महामार्गावर विखरून पडला. तीन दुचाकी आणि त्यावरील प्रवासी जखमी होऊन पडलेले दिसत होते. मात्र,

ठळक मुद्देचरवेलीत अपघात : कोळशाच्या ट्रकखाली चिरडलेल्या स्वाराचे भयंकर दृश्य तो दुचाकीसह ट्रकखाली सापडल्याने त्याच्या गाडीचाही चक्काचूर झाला होता तर त्याची अवस्था अतिशय दयनीय

पाली : अवजड ट्रक चार दुचाकींना ठोकर देऊन उलटला आणि त्यातील कोळसा महामार्गावर विखरून पडला. तीन दुचाकी आणि त्यावरील प्रवासी जखमी होऊन पडलेले दिसत होते. मात्र, त्या ट्रकमधील कोळशाखाली कोणी आहे की नाही, हे समजत नव्हते. अचानक कोळशाखाली एक पाय दिसला आणि इतक्या अवजड ट्रकखाली एखादे वाहन किंवा व्यक्ती असल्यास त्याची अवस्था काय असणार, या कल्पनेनेच बघ्यांबरोबरच पोलीसही हादरले.

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथे झालेला अपघात साºयांच्या जीवाचा थरकाप उडवून गेला. कोळसा वाहून नेणाºया चौदा चाकी ट्रकने ठोकरल्याने तीन दुचाकीवरील प्रवासी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. पलटी झालेल्या ट्रकमधला दगडी कोळसा महामार्गावर विखुरला होता. त्यामुळे पलटी झालेल्या ट्रकखाली कोणी सापडले आहे का, हे कळत नव्हते. चरवेली ग्रामस्थांनी पाली पोलीस दूरक्षेत्र, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राशी संपर्क  साधला.

वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन अपघाताची पाहणी केली. त्यावेळी ट्रकखाली एक दुचाकी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर कोळशाखाली तरुणाचा पाय दिसला. त्यामुळे त्यांनी तत्काळ क्रेन मागवून पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यास सुरुवात केली. ट्रक जसजसा रस्त्यावर येऊ लागला तसतसा ट्रकमधील कोळसा त्या चिरडलेल्या तरुणाच्या अंगावर पडू लागला. त्यामुळे ट्रक खाली किती जण चिरडले गेले, याचा पोलिसांना अंदाज येत नव्हता. त्यामुळे त्यांनी पोकलेन आणले व सर्व कोळसा रस्त्याच्या कडेला लोटून दिला. त्यानंतर मृत तरुणाला बाहेर काढण्यात आले. या तरुणाला बाहेर काढण्यासाठी पाऊण तासाचा अवधी लागला. तो दुचाकीसह ट्रकखाली सापडल्याने त्याच्या गाडीचाही चक्काचूर झाला होता तर त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्याच्याबरोबर असणारा त्याचा मित्र पाठी बसला होता. ट्रकची धडक बसल्यावर तो उडाल्याने बाहेर फेकला गेल्याने बचावला.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश यादव, पोलीस कर्मचारी अनिल गुरव, नाना सावंत, पाली दूरक्षेत्राचे रमेश गावीत, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वैष्णवी यादव उपस्थित होते.

 

पोलीस व्हायचं होतं..

मृत श्रीकांतच्या पश्चात आई-वडील, दोन भावंडे असून, तो सर्वात लहान होता. त्याचे शिक्षण १२ वीपर्यंत झाले होते व सद्यस्थितीत तो पोलीस भरतीची तयारी करीत होता. त्याच्या अधिक माहितीसाठी तो आणि त्याचा मित्र रत्नागिरी येथे निघाले होते. त्याची कौटुंबिक स्थिती अतिशय बेताची आहे.

भविष्य सांगणारे जखमी

अपघातात जखमी झालेले चारजण हे जळगावमधील असून, त्यांचा भविष्य सांगणे हा व्यवसाय आहे. त्यांचा तांडा काही दिवसांपूर्वी पाली येथे मुक्कामाला होता. हा मुक्काम सोडून ते चिपळूण येथे चालले होते. त्यांची एक चारचाकी गाडी पुढे गेली आणि बाकीचे सहा दुचाकीस्वार चालले होते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात