शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

पोलीस व्हायचं होतं.. अपघातस्थळावर हादरले पोलीसही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 10:32 IST

अवजड ट्रक चार दुचाकींना ठोकर देऊन उलटला आणि त्यातील कोळसा महामार्गावर विखरून पडला. तीन दुचाकी आणि त्यावरील प्रवासी जखमी होऊन पडलेले दिसत होते. मात्र,

ठळक मुद्देचरवेलीत अपघात : कोळशाच्या ट्रकखाली चिरडलेल्या स्वाराचे भयंकर दृश्य तो दुचाकीसह ट्रकखाली सापडल्याने त्याच्या गाडीचाही चक्काचूर झाला होता तर त्याची अवस्था अतिशय दयनीय

पाली : अवजड ट्रक चार दुचाकींना ठोकर देऊन उलटला आणि त्यातील कोळसा महामार्गावर विखरून पडला. तीन दुचाकी आणि त्यावरील प्रवासी जखमी होऊन पडलेले दिसत होते. मात्र, त्या ट्रकमधील कोळशाखाली कोणी आहे की नाही, हे समजत नव्हते. अचानक कोळशाखाली एक पाय दिसला आणि इतक्या अवजड ट्रकखाली एखादे वाहन किंवा व्यक्ती असल्यास त्याची अवस्था काय असणार, या कल्पनेनेच बघ्यांबरोबरच पोलीसही हादरले.

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथे झालेला अपघात साºयांच्या जीवाचा थरकाप उडवून गेला. कोळसा वाहून नेणाºया चौदा चाकी ट्रकने ठोकरल्याने तीन दुचाकीवरील प्रवासी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. पलटी झालेल्या ट्रकमधला दगडी कोळसा महामार्गावर विखुरला होता. त्यामुळे पलटी झालेल्या ट्रकखाली कोणी सापडले आहे का, हे कळत नव्हते. चरवेली ग्रामस्थांनी पाली पोलीस दूरक्षेत्र, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राशी संपर्क  साधला.

वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन अपघाताची पाहणी केली. त्यावेळी ट्रकखाली एक दुचाकी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर कोळशाखाली तरुणाचा पाय दिसला. त्यामुळे त्यांनी तत्काळ क्रेन मागवून पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यास सुरुवात केली. ट्रक जसजसा रस्त्यावर येऊ लागला तसतसा ट्रकमधील कोळसा त्या चिरडलेल्या तरुणाच्या अंगावर पडू लागला. त्यामुळे ट्रक खाली किती जण चिरडले गेले, याचा पोलिसांना अंदाज येत नव्हता. त्यामुळे त्यांनी पोकलेन आणले व सर्व कोळसा रस्त्याच्या कडेला लोटून दिला. त्यानंतर मृत तरुणाला बाहेर काढण्यात आले. या तरुणाला बाहेर काढण्यासाठी पाऊण तासाचा अवधी लागला. तो दुचाकीसह ट्रकखाली सापडल्याने त्याच्या गाडीचाही चक्काचूर झाला होता तर त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्याच्याबरोबर असणारा त्याचा मित्र पाठी बसला होता. ट्रकची धडक बसल्यावर तो उडाल्याने बाहेर फेकला गेल्याने बचावला.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश यादव, पोलीस कर्मचारी अनिल गुरव, नाना सावंत, पाली दूरक्षेत्राचे रमेश गावीत, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वैष्णवी यादव उपस्थित होते.

 

पोलीस व्हायचं होतं..

मृत श्रीकांतच्या पश्चात आई-वडील, दोन भावंडे असून, तो सर्वात लहान होता. त्याचे शिक्षण १२ वीपर्यंत झाले होते व सद्यस्थितीत तो पोलीस भरतीची तयारी करीत होता. त्याच्या अधिक माहितीसाठी तो आणि त्याचा मित्र रत्नागिरी येथे निघाले होते. त्याची कौटुंबिक स्थिती अतिशय बेताची आहे.

भविष्य सांगणारे जखमी

अपघातात जखमी झालेले चारजण हे जळगावमधील असून, त्यांचा भविष्य सांगणे हा व्यवसाय आहे. त्यांचा तांडा काही दिवसांपूर्वी पाली येथे मुक्कामाला होता. हा मुक्काम सोडून ते चिपळूण येथे चालले होते. त्यांची एक चारचाकी गाडी पुढे गेली आणि बाकीचे सहा दुचाकीस्वार चालले होते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात