शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

भविष्यात तालुकानिहाय एमआयडीसी उभारण्याचे नियोजन, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:36 IST

राजापूरमध्ये प्रदूषणविरहित प्रकल्प आणू

रत्नागिरी : एमआयडीसी झाली की उद्याेग येतात आणि उद्याेग आले की बेराेजगारी दूर हाेते, ही संकल्पना घेऊन भविष्यात तालुकानिहाय एमआयडीसी उभारण्याचे आमचे नियाेजन आहे, अशी माहिती राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी पाली (ता. रत्नागिरी) येथील निवासस्थानी रविवारी आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.मंत्री उदय सामंत यांचे पाली येथील हेलिपॅडवर आगमन हाेताच पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अडीच वर्षात औद्याेगिकदृष्ट्या मागे गेलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत एक नंबरवर आणण्यात आम्ही यशस्वी झालाे आहाेत. गडचिराेलीच्या टाेकापासून काेकणपर्यंत विविध प्रकारचे काेट्यवधींचे प्रकल्प आणण्यामध्ये यशस्वी झालाे. उद्याेगजगत महायुतीच्या सरकारवर खुश असून, त्या सगळ्यांना साेबत घेऊन लहान उद्याेजकांपासून ते अल्ट्रा मेगा प्राेजेक्टपर्यंतचे जे उद्याेजक आहेत त्यांना समाधानी ठेवणे ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात राजापूर, लांजा, मंडणगडमध्ये नव्याने एमआयडीसी करत आहाेत. रत्नागिरीमध्ये मेर्वी, निवेंडी येथे जागा संपादन करून एमआयडीसी करत आहाेत. एमआयडीसी झाली की उद्याेग येतात आणि उद्याेग आले की राेजगार उपलब्ध हाेतात. त्यामुळे भविष्यात तालुकानिहाय एमआयडीसीची उभारणी केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

पालकमंत्रिपदाबाबत समन्वयपालकमंत्रिपद देण्यासाठी तिघांमध्ये समन्वय आहे. पालकमंत्रिपदाचे ९९ टक्के वाटपही पूर्ण झाले आहे. येत्या दाेन ते तीन दिवसांत स्वत: मुख्यमंत्री पालकमंत्री कोण असतील ते जाहीर करतील. रायगडचा पालकमंत्रीही जाहीर हाेईल, असे ते म्हणाले.

बीड, परभणीला जाणारबीड, परभणी येथे ज्या घटना घडल्या आहेत. त्याबाबत मी दाेन्ही कुटुंबांची भेट घेणार आहे. माझ्यासाेबत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट असतील, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्यजिल्ह्यात आलेले प्राेजेक्ट दाेन वर्षांत पूर्ण झाले तर १५ ते ३० हजार राेजगार उपलब्ध हाेणार आहेत. १५०० मुलांना माेफत त्या कंपनीचे प्रशिक्षण देण्यासाठी परदेशातही पाठविणार आहाेत. हे प्रकल्प पूर्ण हाेण्यासाठी प्राधान्य राहणार आहे.

मिऱ्या एमआयडीसी आमच्या दृष्टीने रद्दमिऱ्या एमआयडीसी ही आमच्या दृष्टीने रद्द झालेली आहे. रद्द करण्याच्या पुढच्या कार्यवाही आम्ही सुरू करू, आम्ही फसविणारे लाेकप्रतिनिधी नाहीत, ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना मतदारांनी काय केले हे सगळ्यांना माहीत आहे. पण, मतदान मिळाल्यानंतर लाेकांना नकाे असलेले पुन्हा करणे हे याेग्य नाही. मिऱ्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार मिऱ्या एमआयडीसी रद्द झालेली आहे.

प्रकल्प आणले ही फसवाफसवी नाहीरत्नागिरी जिल्ह्याला आश्वासन दिलेले प्रकल्प, त्यांचे करार झालेले आहेत, त्याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. आपण प्रकल्प आणले ही फसवाफसवी नव्हती, हे नुसत वचन नव्हते, तर ते प्रकल्प रत्नागिरीत उभे करण्याच्या दृष्टीने फार माेठी ताकद पुन्हा एका उद्याेग विभागामार्फत निर्माण करीत आहाेत. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करू.

राजापूरमध्ये प्रदूषणविरहित प्रकल्प आणूराजापूरमध्येही प्रदूषणविरहित बेराेजगार मुला-मुलींच्या हाताला काम देणारे प्रकल्प आणू. त्यातून फार माेठा राेजगार उपलब्ध करू.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत