शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

पेन्शनचे घोंगडे भिजतच

By admin | Updated: April 1, 2015 00:15 IST

अंमलबजावणी रखडली : श्रीगणेशाची अजूनही प्रतीक्षा

टेंभ्ये : ३० नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने अंशदान पेन्शन योजना लागू केली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अद्याप या योजनेचा श्रीगणेशा झालेला नाही. त्यामुळे अजून किती वर्षे अंशदान पेन्शन योजनेचे ‘भिजत घोंगडे’ राहणार असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.३० नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना शासनाने लागू केली आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला प्रतिमहिना अंशदान भरावे लागणार आहे. हा शासन निर्णय होऊन जवळपास चार ते पाच वर्षे होऊनदेखील अद्याप या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. जिल्हास्तरावरुन संबंधित शिक्षकांची खाते नंबर काढण्यात आले आहेत. परंतु, वरिष्ठ कार्यालयाकडून अंशदान जमा करण्याच्या कोणत्याही सूचना नसल्याने प्रत्यक्षात खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली नाही. याबाबत न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची जवळपास ९ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर या सर्व कालावधीची रक्कम संबंधित उमेदवाराना खात्यात जमा करावी लागणार आहे. यामुळे याबाबतचा निर्णय लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याचे मत संबंधित कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. डिसेंबर २००५ पासून आजपर्यंतची रक्कम खात्यात एकरकमी जमा करणे या कर्मचाऱ्यांना अशक्य होणार आहे. या विलंबाचा मानसिक ताण संबंधित कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.या योजनेबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आतापर्यंत अनेकवेळा माहिती मागवण्यात आली. परंतु, अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत असे निर्णय होत नसल्याने या कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. (वार्ताहर)अंशदान पेन्शन योजनेसाठी आवश्यक असणारी खाती उघडण्याचे काम जिल्ह्यात जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक शिक्षकांचे खाते क्रमांक मिळाले आहेत. परंतु, वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश न मिळाल्याने अंशदान रक्कम जमा करण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश प्राप्त होताच पुढील प्रक्रिया सुरु होईल.- राजेंद्र अहिरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.