शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

पेन्शनचे घोंगडे भिजतच

By admin | Updated: April 1, 2015 00:15 IST

अंमलबजावणी रखडली : श्रीगणेशाची अजूनही प्रतीक्षा

टेंभ्ये : ३० नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने अंशदान पेन्शन योजना लागू केली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अद्याप या योजनेचा श्रीगणेशा झालेला नाही. त्यामुळे अजून किती वर्षे अंशदान पेन्शन योजनेचे ‘भिजत घोंगडे’ राहणार असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.३० नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना शासनाने लागू केली आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला प्रतिमहिना अंशदान भरावे लागणार आहे. हा शासन निर्णय होऊन जवळपास चार ते पाच वर्षे होऊनदेखील अद्याप या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. जिल्हास्तरावरुन संबंधित शिक्षकांची खाते नंबर काढण्यात आले आहेत. परंतु, वरिष्ठ कार्यालयाकडून अंशदान जमा करण्याच्या कोणत्याही सूचना नसल्याने प्रत्यक्षात खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली नाही. याबाबत न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची जवळपास ९ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर या सर्व कालावधीची रक्कम संबंधित उमेदवाराना खात्यात जमा करावी लागणार आहे. यामुळे याबाबतचा निर्णय लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याचे मत संबंधित कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. डिसेंबर २००५ पासून आजपर्यंतची रक्कम खात्यात एकरकमी जमा करणे या कर्मचाऱ्यांना अशक्य होणार आहे. या विलंबाचा मानसिक ताण संबंधित कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.या योजनेबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आतापर्यंत अनेकवेळा माहिती मागवण्यात आली. परंतु, अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत असे निर्णय होत नसल्याने या कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. (वार्ताहर)अंशदान पेन्शन योजनेसाठी आवश्यक असणारी खाती उघडण्याचे काम जिल्ह्यात जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक शिक्षकांचे खाते क्रमांक मिळाले आहेत. परंतु, वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश न मिळाल्याने अंशदान रक्कम जमा करण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश प्राप्त होताच पुढील प्रक्रिया सुरु होईल.- राजेंद्र अहिरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.