शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रत्नागिरी : गाडी वेळेत न सुटल्याने प्रवाशांनी बस रोखली, देवरूख आगाराचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 12:33 IST

देवरूख एस. टी. आगाराचा गलथान कारभार पुन्हा एकदा ऐेरवणीवर आला आहे. आगाराचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. आगारातून दुपारी १२.३० वाजता सुटणारी देवरूख - कुळ्ये गाडी वेळेत न सुटल्याने प्रवाशांनी आगारातून सुटणारी देवरूख- रत्नागिरी बस अडवून आपला संताप व्यक्त केला. अखेर २ वाजता देवरूख - कुळ्ये गाडी मार्गस्थ झाली.

ठळक मुद्देगाडी वेळेत न सुटल्याने प्रवाशांनी बस रोखली, देवरूख आगाराचा कारभारकुळ्ये गाडीचे वेळापत्रक कोलमडल्याने संताप

देवरूख : देवरूख एस. टी. आगाराचा गलथान कारभार पुन्हा एकदा ऐेरवणीवर आला आहे. आगाराचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. आगारातून दुपारी १२.३० वाजता सुटणारी देवरूख - कुळ्ये गाडी वेळेत न सुटल्याने प्रवाशांनी आगारातून सुटणारी देवरूख- रत्नागिरीबस अडवून आपला संताप व्यक्त केला. अखेर २ वाजता देवरूख - कुळ्ये गाडी मार्गस्थ झाली.देवरूख आगारातून १२.३० वाजता देवरूख सायलेमार्गे कुळ्ये ही बस फेरी सोडण्यात येते. मात्र, ही बस गेली अनेक दिवस उशिरा सुटत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच शुक्रवारी ही बस वेळेत न सुटल्याने प्रवासी आक्रमक झाले.एक तास झाला तरी ही बस न सुटल्यामुळे प्रवाशांनी आक्रमक होत १.३० वाजता देवरूख - रत्नागिरी बस आगारातून सुटताच या बस समोर येऊन सायले पंचक्रोशीतील प्रवाशांनी ही बस रोखून धरली. अचानक हा प्रकार घडल्याने रत्नागिरी बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

बस अडवून धरण्याचा हा प्रकार तब्बल २० मिनिटे सुरू होता. प्रवाशांनी बस रोखून धरल्याने आगार प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर आगार प्रशासनाने कुळ्ये बसला आधीच झालेला उशीर लक्षात घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध चालक, वाहक कर्मचाऱ्यांकडून ही बसफेरी २ वाजता सोडण्याची घोषणा केली.बस आगारात लागताच या प्रवाशांनी बसमध्ये बसण्यासाठी धाव घेतली. यानंतर देवरूख - रत्नागिरी बस २ वाजता रत्नागिरीच्या दिशेने रवाना करण्यात आली. मात्र, कुळ्ये ही बस तब्बल दीड तास उशिराने सुटली. तत्पूर्वी रत्नागिरीकडे जाणारी बस प्रवाशांनी बस रोखून धरली होती.गलथान कारभारदेवरूख आगाराचा गलथान कारभार गेली काही महिने चव्हाट्यावर येत आहे. आगारातून बसेस वेळेत न सुटणे, गाडी अर्ध्यावर बंद पडणे यांसारख्या अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रवासी पुरता हैराण झाला आहे. त्याचीच प्रचिती शुक्रवारी सायले - कुळ्ये गावातील प्रवाशांना आली. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी