शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

रत्नागिरी : गाडी वेळेत न सुटल्याने प्रवाशांनी बस रोखली, देवरूख आगाराचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 12:33 IST

देवरूख एस. टी. आगाराचा गलथान कारभार पुन्हा एकदा ऐेरवणीवर आला आहे. आगाराचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. आगारातून दुपारी १२.३० वाजता सुटणारी देवरूख - कुळ्ये गाडी वेळेत न सुटल्याने प्रवाशांनी आगारातून सुटणारी देवरूख- रत्नागिरी बस अडवून आपला संताप व्यक्त केला. अखेर २ वाजता देवरूख - कुळ्ये गाडी मार्गस्थ झाली.

ठळक मुद्देगाडी वेळेत न सुटल्याने प्रवाशांनी बस रोखली, देवरूख आगाराचा कारभारकुळ्ये गाडीचे वेळापत्रक कोलमडल्याने संताप

देवरूख : देवरूख एस. टी. आगाराचा गलथान कारभार पुन्हा एकदा ऐेरवणीवर आला आहे. आगाराचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. आगारातून दुपारी १२.३० वाजता सुटणारी देवरूख - कुळ्ये गाडी वेळेत न सुटल्याने प्रवाशांनी आगारातून सुटणारी देवरूख- रत्नागिरीबस अडवून आपला संताप व्यक्त केला. अखेर २ वाजता देवरूख - कुळ्ये गाडी मार्गस्थ झाली.देवरूख आगारातून १२.३० वाजता देवरूख सायलेमार्गे कुळ्ये ही बस फेरी सोडण्यात येते. मात्र, ही बस गेली अनेक दिवस उशिरा सुटत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच शुक्रवारी ही बस वेळेत न सुटल्याने प्रवासी आक्रमक झाले.एक तास झाला तरी ही बस न सुटल्यामुळे प्रवाशांनी आक्रमक होत १.३० वाजता देवरूख - रत्नागिरी बस आगारातून सुटताच या बस समोर येऊन सायले पंचक्रोशीतील प्रवाशांनी ही बस रोखून धरली. अचानक हा प्रकार घडल्याने रत्नागिरी बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

बस अडवून धरण्याचा हा प्रकार तब्बल २० मिनिटे सुरू होता. प्रवाशांनी बस रोखून धरल्याने आगार प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर आगार प्रशासनाने कुळ्ये बसला आधीच झालेला उशीर लक्षात घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध चालक, वाहक कर्मचाऱ्यांकडून ही बसफेरी २ वाजता सोडण्याची घोषणा केली.बस आगारात लागताच या प्रवाशांनी बसमध्ये बसण्यासाठी धाव घेतली. यानंतर देवरूख - रत्नागिरी बस २ वाजता रत्नागिरीच्या दिशेने रवाना करण्यात आली. मात्र, कुळ्ये ही बस तब्बल दीड तास उशिराने सुटली. तत्पूर्वी रत्नागिरीकडे जाणारी बस प्रवाशांनी बस रोखून धरली होती.गलथान कारभारदेवरूख आगाराचा गलथान कारभार गेली काही महिने चव्हाट्यावर येत आहे. आगारातून बसेस वेळेत न सुटणे, गाडी अर्ध्यावर बंद पडणे यांसारख्या अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रवासी पुरता हैराण झाला आहे. त्याचीच प्रचिती शुक्रवारी सायले - कुळ्ये गावातील प्रवाशांना आली. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी