शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

Parshuram Ghat: परशुराम घाट पुढील एक महिना 'या'वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार, काम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 18:58 IST

वाहतूक कळंबस्ते, आंबडस मार्गे चिरणी, लोटे या पर्यायी मार्गावर वळविल्याने दुपारनंतर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी पुढील एक महिना दिवसाचे सहा तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. आज सोमवारपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मात्र, घाट बंद करताना बांधकाम कंपनीकडून बॅरिकेट्स व फलक उपलब्ध न केल्याने बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली.परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. साधारण २ किलोमीटर अंतराचा हा घाट असून, त्यातील ४०० मीटर अंतराचा घाट अत्यंत धोकादायक आहे. याभागात २३ मीटर उंचीपर्यंतच्या दरडी असल्याने व बराचसा भाग मुरूमाचा असल्याने हा धोका आणखी वाढला आहे. त्याशिवाय घाटाच्या माथ्यावर व पायथ्याला वस्ती असल्याने येथील अनेक कुटुंब भीतीच्या छायेत आहेत. तूर्तास घाटाच्या खालील बाजूस सुमारे दीडशे मीटरहून अधिक लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.तसेच रस्त्याच्या वरील बाजूनेही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. त्यानंतर एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण आधी पूर्ण केले जाणार आहे. पावसाळा तोंडावर आल्याने या कामाची घाई सुरु झाली आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद केली. ही वाहतूक कळंबस्ते, आंबडस मार्गे चिरणी, लोटे या पर्यायी मार्गावर वळविल्याने दुपारनंतर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.परशुराम घाट बंद ठेवण्याच्या निर्देशानंतर ठेकेदार चेतक कंपनीकडून त्याची कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती. त्यामुळे सोमवारी पहिल्याच दिवशी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश निगडे, शाखा अभियंता आर. आर. मराठे यांनी सवतसडा धबधब्यासमोर पोलीस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी भेट देऊन त्याठिकाणी तातडीने सूचना फलक उभारण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मंगळवारपासून नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी