शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अलिबाबा आणि ४० चोर, परब यांची हकालपट्टी होईपर्यंत पाठपुरावा करणार : सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 2:26 PM

रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट उभारताना त्यात फौजदारी गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच ठाकरे ...

रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट उभारताना त्यात फौजदारी गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच ठाकरे सरकारने त्यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत रिसॉर्ट पाडले जात नाही आणि परब यांची पदावरून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आपण आपला पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत दिली.

ठाकरे सरकारने चार महिन्यांपूर्वी अनिल परब यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. मग अजून कारवाई का होत नाही, याची माहिती घेण्यासाठी आपण रत्नागिरीमध्ये आलो होतो. त्यासाठी आपण जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेतली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली.

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृत आहे. ते सीआरझेडच्या ना विकास क्षेत्रात आहे, त्यामुळे ते ताबडतोब तोडण्यात यावे, असे आदेश महाराष्ट्र कोस्टल झोन ॲथॉरिटीने चार महिन्यांपूर्वीच दिले आहेत. या रिसॉर्टसाठी देण्यात आलेला अकृषक परवाना बेकायदेशीर असल्याचे रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि राज्याचे महसूल सचिव यांनी लोकायुक्तांसमोरील सुनावणीमध्ये मान्य केले आहे. तो परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी या सुनावणीत सांगितले. आतापर्यंत याबाबत कार्यवाही झाली नसल्याने आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्याला सांगितले आहे, असे सोमय्या म्हणाले.

अनिल परब यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये २०१९/२० या वर्षाची आणि डिसेंबर २०२० मध्ये २०२०/२०२१ या आर्थित वर्षाची घरपट्टी स्वत:च्या नावाच्या बँक खात्यातून भरली आहे. रिसॉर्टसाठी लागणारी ३ फेज विद्युत जोडणी अनिल परब यांनीच मार्च २०२० मध्ये घेतली आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे मान्य करून ते पाडण्याचे आदेश देण्याचेही राज्य सरकारने कबूल केले आहे. मात्र अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. ७ डिसेंबरला लोकायुक्तांकडे पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यावेळी आपण हा विषय तेथे मांडणार असल्याचे ते म्हणाले.

लोक मरत हाेते, हे रिसॉर्ट बांधत होते

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हा लोक मरत होते, तेव्हा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब दापोलीमध्ये रिसॉर्ट बांधत होते, असा आरोप सोमय्या यांनी केला. त्यामुळेच आपण हा घोटाळेबाजपणा उघड केला आहे. आता परब यांची हकालपट्टी होईपर्यंत आपला याबाबतचा पाठपुरावा सुरूच राहील, असे सोमय्या यांनी सांगितले.

अलिबाबा आणि ४० चोर

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर अलिबाबा आणि चाळीस चोर असा वारंवार आरोप करून सोमय्या यांनी आपण आतापर्यंत २८ जण उघड केले असल्याचे सांगितले. आता आणखाी १२ जण बाकी आहेत. अनिल परब हे उजवा हात असल्याने मुख्यमंत्री ठाकरे त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पुढचा निशाणा अर्जुन खोतकर

आता सोमय्या यांच्या निशाण्यावर कोण आहे, असा प्रश्न करण्यात आला असता, ते म्हणाले की, आता अर्जुन खोतकर यांच्याबाबतच्या तक्रारीचा पाठपुरावा आपण करणार आहोत. रूपाली विश्वास नांगरे-पाटील यांचाही त्यात सहभाग असून, सगळ्या गोष्टी लवकरच उघड होतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परबKirit Somaiyaकिरीट सोमय्या