शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

अलिबाबा आणि ४० चोर, परब यांची हकालपट्टी होईपर्यंत पाठपुरावा करणार : सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 14:28 IST

रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट उभारताना त्यात फौजदारी गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच ठाकरे ...

रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट उभारताना त्यात फौजदारी गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच ठाकरे सरकारने त्यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत रिसॉर्ट पाडले जात नाही आणि परब यांची पदावरून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आपण आपला पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत दिली.

ठाकरे सरकारने चार महिन्यांपूर्वी अनिल परब यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. मग अजून कारवाई का होत नाही, याची माहिती घेण्यासाठी आपण रत्नागिरीमध्ये आलो होतो. त्यासाठी आपण जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेतली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली.

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृत आहे. ते सीआरझेडच्या ना विकास क्षेत्रात आहे, त्यामुळे ते ताबडतोब तोडण्यात यावे, असे आदेश महाराष्ट्र कोस्टल झोन ॲथॉरिटीने चार महिन्यांपूर्वीच दिले आहेत. या रिसॉर्टसाठी देण्यात आलेला अकृषक परवाना बेकायदेशीर असल्याचे रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि राज्याचे महसूल सचिव यांनी लोकायुक्तांसमोरील सुनावणीमध्ये मान्य केले आहे. तो परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी या सुनावणीत सांगितले. आतापर्यंत याबाबत कार्यवाही झाली नसल्याने आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्याला सांगितले आहे, असे सोमय्या म्हणाले.

अनिल परब यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये २०१९/२० या वर्षाची आणि डिसेंबर २०२० मध्ये २०२०/२०२१ या आर्थित वर्षाची घरपट्टी स्वत:च्या नावाच्या बँक खात्यातून भरली आहे. रिसॉर्टसाठी लागणारी ३ फेज विद्युत जोडणी अनिल परब यांनीच मार्च २०२० मध्ये घेतली आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे मान्य करून ते पाडण्याचे आदेश देण्याचेही राज्य सरकारने कबूल केले आहे. मात्र अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. ७ डिसेंबरला लोकायुक्तांकडे पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यावेळी आपण हा विषय तेथे मांडणार असल्याचे ते म्हणाले.

लोक मरत हाेते, हे रिसॉर्ट बांधत होते

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हा लोक मरत होते, तेव्हा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब दापोलीमध्ये रिसॉर्ट बांधत होते, असा आरोप सोमय्या यांनी केला. त्यामुळेच आपण हा घोटाळेबाजपणा उघड केला आहे. आता परब यांची हकालपट्टी होईपर्यंत आपला याबाबतचा पाठपुरावा सुरूच राहील, असे सोमय्या यांनी सांगितले.

अलिबाबा आणि ४० चोर

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर अलिबाबा आणि चाळीस चोर असा वारंवार आरोप करून सोमय्या यांनी आपण आतापर्यंत २८ जण उघड केले असल्याचे सांगितले. आता आणखाी १२ जण बाकी आहेत. अनिल परब हे उजवा हात असल्याने मुख्यमंत्री ठाकरे त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पुढचा निशाणा अर्जुन खोतकर

आता सोमय्या यांच्या निशाण्यावर कोण आहे, असा प्रश्न करण्यात आला असता, ते म्हणाले की, आता अर्जुन खोतकर यांच्याबाबतच्या तक्रारीचा पाठपुरावा आपण करणार आहोत. रूपाली विश्वास नांगरे-पाटील यांचाही त्यात सहभाग असून, सगळ्या गोष्टी लवकरच उघड होतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परबKirit Somaiyaकिरीट सोमय्या