शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाबा आणि ४० चोर, परब यांची हकालपट्टी होईपर्यंत पाठपुरावा करणार : सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 14:28 IST

रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट उभारताना त्यात फौजदारी गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच ठाकरे ...

रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट उभारताना त्यात फौजदारी गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच ठाकरे सरकारने त्यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत रिसॉर्ट पाडले जात नाही आणि परब यांची पदावरून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आपण आपला पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत दिली.

ठाकरे सरकारने चार महिन्यांपूर्वी अनिल परब यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. मग अजून कारवाई का होत नाही, याची माहिती घेण्यासाठी आपण रत्नागिरीमध्ये आलो होतो. त्यासाठी आपण जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेतली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली.

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृत आहे. ते सीआरझेडच्या ना विकास क्षेत्रात आहे, त्यामुळे ते ताबडतोब तोडण्यात यावे, असे आदेश महाराष्ट्र कोस्टल झोन ॲथॉरिटीने चार महिन्यांपूर्वीच दिले आहेत. या रिसॉर्टसाठी देण्यात आलेला अकृषक परवाना बेकायदेशीर असल्याचे रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि राज्याचे महसूल सचिव यांनी लोकायुक्तांसमोरील सुनावणीमध्ये मान्य केले आहे. तो परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी या सुनावणीत सांगितले. आतापर्यंत याबाबत कार्यवाही झाली नसल्याने आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्याला सांगितले आहे, असे सोमय्या म्हणाले.

अनिल परब यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये २०१९/२० या वर्षाची आणि डिसेंबर २०२० मध्ये २०२०/२०२१ या आर्थित वर्षाची घरपट्टी स्वत:च्या नावाच्या बँक खात्यातून भरली आहे. रिसॉर्टसाठी लागणारी ३ फेज विद्युत जोडणी अनिल परब यांनीच मार्च २०२० मध्ये घेतली आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे मान्य करून ते पाडण्याचे आदेश देण्याचेही राज्य सरकारने कबूल केले आहे. मात्र अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. ७ डिसेंबरला लोकायुक्तांकडे पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यावेळी आपण हा विषय तेथे मांडणार असल्याचे ते म्हणाले.

लोक मरत हाेते, हे रिसॉर्ट बांधत होते

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हा लोक मरत होते, तेव्हा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब दापोलीमध्ये रिसॉर्ट बांधत होते, असा आरोप सोमय्या यांनी केला. त्यामुळेच आपण हा घोटाळेबाजपणा उघड केला आहे. आता परब यांची हकालपट्टी होईपर्यंत आपला याबाबतचा पाठपुरावा सुरूच राहील, असे सोमय्या यांनी सांगितले.

अलिबाबा आणि ४० चोर

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर अलिबाबा आणि चाळीस चोर असा वारंवार आरोप करून सोमय्या यांनी आपण आतापर्यंत २८ जण उघड केले असल्याचे सांगितले. आता आणखाी १२ जण बाकी आहेत. अनिल परब हे उजवा हात असल्याने मुख्यमंत्री ठाकरे त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पुढचा निशाणा अर्जुन खोतकर

आता सोमय्या यांच्या निशाण्यावर कोण आहे, असा प्रश्न करण्यात आला असता, ते म्हणाले की, आता अर्जुन खोतकर यांच्याबाबतच्या तक्रारीचा पाठपुरावा आपण करणार आहोत. रूपाली विश्वास नांगरे-पाटील यांचाही त्यात सहभाग असून, सगळ्या गोष्टी लवकरच उघड होतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परबKirit Somaiyaकिरीट सोमय्या