शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

पन्हाळेकाझीत घराला आग; एकाचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:07 IST

तालुक्यातील पन्हाळेकाझी बोरवाडी येथील घराला आग लागून शशिकांत दत्ताराम पेडणेकर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देतब्बल दोन तासांनी सुनिता बबन जाधव यांनी ही आग पाहिली. परंतु त्यापूर्वीच शशिकांत होरपळून मृत्यु पावले होते.
दापोली : तालुक्यातील पन्हाळेकाझी बोरवाडी येथील घराला आग लागून शशिकांत दत्ताराम पेडणेकर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली.शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेच्या वेळी ते एकटेच होते. रात्री ते आपल्या भावाच्या घरी आई वडिलांसोबत झोपले होते. सकाळी ७ वाजता देवपूजा करण्यासाठी ते आपल्या घरी गेले होते. मात्र अचानक घराने पेट घेतला. पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून त्यांनी घरावर प्लास्टिक अंथरले होते. शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्यानंतर ते बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच आगीन घेरले व त्यांचा आगीत जळून मृत्यू झाला. त्यांची पत्नी माहेरी होती. मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो. त्यांच्या मुलीचा विवाह झाला आहे. त्यामुळे ते घरी एकटे होते. शनिवारी दुपारी ते खेडला जाणार होते. परंतु सकाळीच त्यांचा होरपळून मृत्यु झाला आहे.पोलीस यंत्रणा, तहसीलदार सुरेश खोपकर, संजय गुरव, मंडल अधिकारी दाभोळ एम. एस. पांडे, मंडल अधिकारी वेळवी सुभाष आंजर्लेकर, एस. एम. सुपल, प्रमोद बोरसे, अक्षय महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या घटनेची माहिती पन्हाळेकाझी पोलिस पाटील बाळकृष्ण विठोबा जाधव यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार अनंत पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल मोहन कांबळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुजीत तळवटकर यांनी घटनास्थली येवून पंचनामा केला.

शशिकांत पेडणेकर यांची पत्नी शकुंतला या आजारी असल्याने कुळवंडी खेड येथे माहेरी असतात. शशिकांत लोटे येथे मिस्त्री काम करत होते. बोरवाड़ी येथे त्यांचे जुने घर आहे. पावसापूर्वी घराची तयारी करण्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी पन्हाळेकाझी गावात आले होते. शशिकांत पेडणेकर यांचे आई-वडील वयोवृद्ध आहेत. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, कुटुंबाचा पोशिंदा गेल्यामुळे पेडणेकर कुटुंबाला शासनाकडून मद्त मिळावी असी मागणी केली जात आहे.बोरवाड़ीत केवळ तीन घरे आहेत. वाडी गावापासून लांब आहे शशिकांत पेडणेकर यांचे घर थोड्या अंतरावर आहे. आजूबाजूला घरे नसल्याने आग दिसली नाही. मात्र तब्बल दोन तासांनी सुनिता बबन जाधव यांनी ही आग पाहिली. परंतु त्यापूर्वीच शशिकांत होरपळून मृत्यु पावले होते.घराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शासकीय यंत्रणा पोहचायला विलंब झाला. पोलिस, महसूल कर्मचारी पायपीट करत घटनास्थळी पोहचले. शववाहिनी घटनास्थळी पोहचु शकली नाही. दत्ताराम पेडणेकर यांचा मोठा मलगा नदीत वाहून जाऊन मृत्यु झाला होता. आता दुसरा मलगा जळून मृत्युमुखी पडल्याने पेडणेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यू