शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

पालीत बायपास रोड सर्वेक्षणामुळे रणकंदन?

By admin | Updated: March 16, 2017 23:41 IST

महामार्ग चौपदरीकरण : नुकसानभरपाई अडकली आणेवारीत

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीुंमुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणात पाली बाजारपेठेत उड्डाणपूल मंजूर करण्यात आलेला असतानाही बायपासच्या सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात हे सर्वेक्षण होणार असून, त्यासाठी ४५ ते ६० मीटर रुंदीची १० किलोमीटर लांबीची जागा बागायतदार देतील की नाही, या मुद्यावरून पालीमध्ये रणकंदन माजण्याची भीती व्यक्त होत आहे. चौपदरीकरण जागेचे नुकसानभरपाई वितरणही आणेवारीत अडकल्याने पावसाळ्यानंतरच चौपदरीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्ग चौपदरीकरणातील अडथळे असलेल्या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यात चिपळूण, पाली, लांजा येथे असे उड्डाणपूल होणार आहेत. त्याबाबतचा आराखडाही तयार झाला आहे. आता या आराखड्यात बदल केल्यास चौपदरीकरण प्रक्रियेत अधिक वेळ जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच पाली येथील मंजूर उड्डाणपुलाला होणाऱ्या खर्चाच्या दहापट खर्च बायपास रोडला येईल. त्यामुळे हा प्रस्ताव आर्थिक स्तरावर टिकणारा नाही, असेही तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. शासनाकडून पाली येथे उड्डाणपुलाऐवजी या बायपासच्या प्रस्तावाला मान्यता मिळणे न मिळणे हा वेगळा मुद्दा आहे. पाली येथे मंजूर झालेला उड्डाणपूल हा ८० मीटर लांबीचा आहे. मात्र, असे असताना बायपास मार्गाचा अट्टाहास काहीजणांकडून धरला जात आहे. उड्डाणपुलाऐवजी बायपास रोड उभारावयाचा झाल्यास त्यासाठी १० किलोमीटर लांबीची व ६० मीटर रुंदीची जागा लागणार आहे. मात्र त्यासाठी ज्या बागायतदारांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत, ते याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सर्वेक्षणावेळी या प्रश्नावरून वादंग होण्याची भीती व्यक्त होत आहे. पालीत बायपास रोड होऊ शकणार नाही, हे राजकीय नेत्यांनाही माहीत असून, संबंधितांचे समाधान व्हावे, हाच या सर्वेक्षणामागील हेतू असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीची भूमी संपादन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये जागा संपादीत होणाऱ्या मालकांना जागेची भरपाई देण्यासाठी निधीही महसूल विभागाकडे आला आहे. मात्र, निधी येऊनही आणेवारीतील गुंतागुंतीमुळे त्याचे वाटप अद्यापही सुरू झालेले नाही. सुरुवातीला सातबारावर काही नावेच होती. महसूल विभागाकडून पुुन्हा फेरफार मागविले गेल्यानंतर सातबारावरील नावांची यादी वाढली आहे. त्यामुळे वाटप होणाऱ्या भरपाई रकमेची आणेवारी ठरविण्यातच महसूल खात्याचा अधिक वेळ जाणार आहे. परिणामी यंदाच्या पावसाळ्याआधी चौपदरीकरणाचे काम सुरू होणे केवळ अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.कॉँक्रिटीकरणातून चौपदरीकरण होणार असले, तरी रुंदीकरणासाठी घेतलेल्या अतिरिक्त जागेचा भराव पावसाळ्यात करणे अशक्य आहे. मात्र, पावसाळ्यात महामार्गावरील काही पुलांचे काम सुरू केले जाऊ शकेल, असे महामार्ग विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. पावसाळ्यानंतरच महामार्गाच्या अतिरिक्त जागेचा भराव होईल तोपर्यंत प्रत्यक्ष कॉँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाला सुरूवात होण्यास जानेवारी २०१८ वर्ष उजाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.