शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

पालीत बायपास रोड सर्वेक्षणामुळे रणकंदन?

By admin | Updated: March 16, 2017 23:41 IST

महामार्ग चौपदरीकरण : नुकसानभरपाई अडकली आणेवारीत

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीुंमुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणात पाली बाजारपेठेत उड्डाणपूल मंजूर करण्यात आलेला असतानाही बायपासच्या सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात हे सर्वेक्षण होणार असून, त्यासाठी ४५ ते ६० मीटर रुंदीची १० किलोमीटर लांबीची जागा बागायतदार देतील की नाही, या मुद्यावरून पालीमध्ये रणकंदन माजण्याची भीती व्यक्त होत आहे. चौपदरीकरण जागेचे नुकसानभरपाई वितरणही आणेवारीत अडकल्याने पावसाळ्यानंतरच चौपदरीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्ग चौपदरीकरणातील अडथळे असलेल्या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यात चिपळूण, पाली, लांजा येथे असे उड्डाणपूल होणार आहेत. त्याबाबतचा आराखडाही तयार झाला आहे. आता या आराखड्यात बदल केल्यास चौपदरीकरण प्रक्रियेत अधिक वेळ जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच पाली येथील मंजूर उड्डाणपुलाला होणाऱ्या खर्चाच्या दहापट खर्च बायपास रोडला येईल. त्यामुळे हा प्रस्ताव आर्थिक स्तरावर टिकणारा नाही, असेही तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. शासनाकडून पाली येथे उड्डाणपुलाऐवजी या बायपासच्या प्रस्तावाला मान्यता मिळणे न मिळणे हा वेगळा मुद्दा आहे. पाली येथे मंजूर झालेला उड्डाणपूल हा ८० मीटर लांबीचा आहे. मात्र, असे असताना बायपास मार्गाचा अट्टाहास काहीजणांकडून धरला जात आहे. उड्डाणपुलाऐवजी बायपास रोड उभारावयाचा झाल्यास त्यासाठी १० किलोमीटर लांबीची व ६० मीटर रुंदीची जागा लागणार आहे. मात्र त्यासाठी ज्या बागायतदारांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत, ते याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सर्वेक्षणावेळी या प्रश्नावरून वादंग होण्याची भीती व्यक्त होत आहे. पालीत बायपास रोड होऊ शकणार नाही, हे राजकीय नेत्यांनाही माहीत असून, संबंधितांचे समाधान व्हावे, हाच या सर्वेक्षणामागील हेतू असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीची भूमी संपादन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये जागा संपादीत होणाऱ्या मालकांना जागेची भरपाई देण्यासाठी निधीही महसूल विभागाकडे आला आहे. मात्र, निधी येऊनही आणेवारीतील गुंतागुंतीमुळे त्याचे वाटप अद्यापही सुरू झालेले नाही. सुरुवातीला सातबारावर काही नावेच होती. महसूल विभागाकडून पुुन्हा फेरफार मागविले गेल्यानंतर सातबारावरील नावांची यादी वाढली आहे. त्यामुळे वाटप होणाऱ्या भरपाई रकमेची आणेवारी ठरविण्यातच महसूल खात्याचा अधिक वेळ जाणार आहे. परिणामी यंदाच्या पावसाळ्याआधी चौपदरीकरणाचे काम सुरू होणे केवळ अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.कॉँक्रिटीकरणातून चौपदरीकरण होणार असले, तरी रुंदीकरणासाठी घेतलेल्या अतिरिक्त जागेचा भराव पावसाळ्यात करणे अशक्य आहे. मात्र, पावसाळ्यात महामार्गावरील काही पुलांचे काम सुरू केले जाऊ शकेल, असे महामार्ग विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. पावसाळ्यानंतरच महामार्गाच्या अतिरिक्त जागेचा भराव होईल तोपर्यंत प्रत्यक्ष कॉँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाला सुरूवात होण्यास जानेवारी २०१८ वर्ष उजाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.