दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी खोटे आरोप करत असून, त्यांनी मला बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत केला आहे. आपण दळवी यांच्याविरोधात १० कोटी रूपयांचा अब्रूनूकसानाचा दावा ठोकणार आहोत. ...
कोकणातील सर्वात मोठ्या सणाने बाजारपेठेला आलेली मंदी काही प्रमाणात तरी दूर केली आहे. गणेशोत्सवासाठी म्हणून झालेल्या खरेदीविक्रीमध्ये दहा कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही उलाढाल पूर्णपणे रोख स्वरूपातच होत असल्याने गण ...
संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेत ४१ विद्यार्थी असून, सातवीपर्यंत फक्त दोन शिक्षकच कार्यरत आहेत. या दोनही शिक्षकांची बदली करण्यात आली असून, अद्याप एकही शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी अखेर शुक्रवारी शाळेलाच टाळे ठोकले. ...
भाजपसाठी शिल्लक राहिलेला एकमेव गुहागर मतदारसंघही आता विद्यमान आमदार म्हणून सेनेच्या गळ्यात पडण्याची शक्यता असल्याने भाजपला जिल्ह्यात उमेदवारीसाठी विधानसभा मतदारसंघच शिल्लक राहणार नाही. ...
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार ४२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. हळवे बियाणे प्रसवण्यावेळीच पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील ४० टक्के भातपीक धोक्यात आले आहे. ...
संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल ...