शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
4
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
5
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
6
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
7
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
8
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
9
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
10
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
11
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
12
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
13
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
14
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
15
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
16
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
17
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
18
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
19
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
20
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?

अतिवृष्टीने गिळले भात, रत्नागिरी जिल्ह्यात पन्नास टक्के शेती वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:13 IST

farmar, rain, ratnagirinews अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पन्नास टक्केपेक्षा अधिक भात क्षेत्र बाधित झाले आहे. कापलेली भातशेती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीने गिळले भातरत्नागिरी जिल्ह्यात पन्नास टक्के शेती वाया

रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पन्नास टक्केपेक्षा अधिक भात क्षेत्र बाधित झाले आहे. कापलेली भातशेती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड, तर १२ हजार हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात आली आहे. हळवे भातपीक तयार झाल्याने शेतकऱ्यांनी भातकापणीला प्रारंभ केला होता. १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातपीक वाचले असले तरी उर्वरित भातपिकाचे नुकसान झाले आहे.यावर्षी पाऊस लांबल्याने भात कापणीला विलंब झाला. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी भात कापणी केली. मात्र, गेल्या आठवड्यात शनिवारी भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाने चांगलाच चकवा दिला.

शनिवारपासून सतत पाऊस सुरू होता. मंगळवारी दुपारपर्यंत ऊन होते. मात्र, सायंकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. परिणामी कापून वाळविण्यासाठी ठेवलेले भात शेतकऱ्यांना घरी आणता आले नाही. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यात नदीकाठच्या भातशेतीला चांगलाच तडाखा बसला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर कापलेली शेतीच वाहून गेल्याने शेतकरी संकटात आला आहे. शिवाय काही ठिकाणी भात खाचरात साचलेल्या पाण्यात कापलेले भात तरंगत आहे.

सोसाट्याचे वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी यामुळे तयार भात जमिनीवर आडवेतिडवे कोसळले असून, भात खाचरात पाणी साचले आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाताला अंकुर फुटले आहेत. तयार पिकाचे नुकसान पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनाने कृषी विभागाला शेतीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले क्षेत्र कमी असल्याने मक्तेदारी पध्दतीने पिके घेण्यात येतात. कष्टाने पिकविलेले धान्य पदरात येण्यापूर्वीच निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने तत्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी