शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
4
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
5
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
6
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
7
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
8
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
9
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
10
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
11
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
12
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
13
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
14
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
15
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
16
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
17
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
18
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
19
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
20
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने गिळले भात, रत्नागिरी जिल्ह्यात पन्नास टक्के शेती वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:13 IST

farmar, rain, ratnagirinews अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पन्नास टक्केपेक्षा अधिक भात क्षेत्र बाधित झाले आहे. कापलेली भातशेती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीने गिळले भातरत्नागिरी जिल्ह्यात पन्नास टक्के शेती वाया

रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पन्नास टक्केपेक्षा अधिक भात क्षेत्र बाधित झाले आहे. कापलेली भातशेती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड, तर १२ हजार हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात आली आहे. हळवे भातपीक तयार झाल्याने शेतकऱ्यांनी भातकापणीला प्रारंभ केला होता. १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातपीक वाचले असले तरी उर्वरित भातपिकाचे नुकसान झाले आहे.यावर्षी पाऊस लांबल्याने भात कापणीला विलंब झाला. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी भात कापणी केली. मात्र, गेल्या आठवड्यात शनिवारी भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाने चांगलाच चकवा दिला.

शनिवारपासून सतत पाऊस सुरू होता. मंगळवारी दुपारपर्यंत ऊन होते. मात्र, सायंकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. परिणामी कापून वाळविण्यासाठी ठेवलेले भात शेतकऱ्यांना घरी आणता आले नाही. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यात नदीकाठच्या भातशेतीला चांगलाच तडाखा बसला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर कापलेली शेतीच वाहून गेल्याने शेतकरी संकटात आला आहे. शिवाय काही ठिकाणी भात खाचरात साचलेल्या पाण्यात कापलेले भात तरंगत आहे.

सोसाट्याचे वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी यामुळे तयार भात जमिनीवर आडवेतिडवे कोसळले असून, भात खाचरात पाणी साचले आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाताला अंकुर फुटले आहेत. तयार पिकाचे नुकसान पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनाने कृषी विभागाला शेतीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले क्षेत्र कमी असल्याने मक्तेदारी पध्दतीने पिके घेण्यात येतात. कष्टाने पिकविलेले धान्य पदरात येण्यापूर्वीच निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने तत्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी