शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

किडींमुळे लांजातील भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 19:19 IST

भातशेती परिपक्व होऊन कापण्यायोग्य झाली असताना लांजा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने भातावरती किडींचा पादुर्भाव होत आहे. यामुळे रिंगणे परिसरातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची भीती पावसाच्या पाण्यामुळे पिकांवरती किंडींचा प्रादुर्भाव शेतकरी झाला हताश

लांजा , दि. १४ : भातशेती परिपक्व होऊन कापण्यायोग्य झाली असताना लांजा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने भातावरती किडींचा पादुर्भाव होत आहे. यामुळे रिंगणे परिसरातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.जून व जुलै महिन्यात लागवड केले जाणारे भातपीक आॅक्टोबर महिन्यामध्ये परिपक्व होऊन कापण्या योग्य होते. आॅक्टोबर महिन्यात भातपीक कापण्यास सुरूवात होते. मात्र, यावर्षी अजूनही पावसाचे थैमान सुरूच आहे. पावसाच्या पाण्यामुळे पिकांवरती किंडींचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने शेतकरी हताश झाला आहे.लांजा तालुक्यातील रिंगणे गावातील हांदे वाडी, पाटीलवाडी व रिंगणे कोंड, कोंडगे गावातील खोरगाव व गुरववाडी, कुरंग गावातील बांधवाडी, बौध्दवाडी व कदमवाडी येथील भातपिकावरती किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. मिळेल तेवढे भात जमविण्याचा आटोकाट प्रयत्न येथील शेतकरी करत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीkonkanकोकण