शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सगळ्याच प्रकल्पांना विरोध, ‘त्यां’ना हवंय तरी काय?; एनजीओविरुद्ध आता स्थानिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:36 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा झाली, तेव्हा जे लोक विरोध करण्यासाठी पुढे होते, तेच लोक नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी उभे राहिले. आता बारसूमध्येही तेच लोक विरोध करत आहेत.

मनोज मुळ्येरत्नागिरी : जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणाऱ्या काही सामाजिक संस्थांना (एनजीओंना) आता राजापूर तालुक्यातील बारसू गावात स्थानिक लोकांकडून कडाडून विरोध होऊ लागला आहे. या संस्थांमधील काही ठराविक लोक प्रत्येक प्रकल्पालाच विरोध करत असल्याने त्यांच्या या भूमिकेमागे नेमके कोण आहेत, याची शंका आता लोकच घेत आहेत.तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणार आणि परिसरातील १३ गावांमध्ये उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले. मात्र त्याला खूप विरोध असल्याचे चित्र उभे केले गेले. त्यावेळी काही सामाजिक संस्थांनी, विशेषत: त्यातील काही व्यक्तींनी दबावतंत्राचा वापर करून लोकांना प्रकल्पाबाबत भीती दाखवली. देवासमोर नारळ ठेवून लोकांना शपथा घ्यायला लावल्या. त्यामुळे लोकांनी प्रकल्प हवा असूनही, उघडपणे समर्थन केले नाही.‘आम्ही लोकांच्या बाजूने’ अशी बोटचेपी भूमिका घेत शिवसेनेने या विरोधाची बाजू उचलून धरली आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला प्रकल्पाची अधिसूचना रद्द करणे भाग पाडले. आता याच शिवसेनेची भूमिका बदलली आहे. नाणारला प्रकल्पाच्या विरोधात उभी राहिलेल्या शिवसेनेने प्रकल्प हवा आहे, असे म्हणणाऱ्या लोकांची बाजू एकदाही ऐकून घेतली नाही. प्रकल्प विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रकल्पांचे समर्थन करणाऱ्यांना भेटीसाठी वेळही दिला नाही. उलट प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या लोकांना शिवसेनेच्या नेत्यांनी ‘दलाल’ अशा शब्दात हिणवले. तीच शिवसेना आता बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी विशेष पुढाकार घेत आहे.आता बारसू येथे एमआयडीसी उभारण्यासाठी काही जागा घेतली जात आहे. त्याचे सर्वेक्षण चालू आहे. मुळात नाणारप्रमाणेच बारसू भागातील असंख्य लोकांना हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी जागा मालकांची संमती आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. पण, त्यात काही एनजीओ बाधा आणत आहेत. स्थानिक लोक प्रकल्पाच्या बाजूने उभे राहत असताना काही स्वयंसेवी संस्थांचे पुढारी त्यात खोडा घालू पाहत आहेत. त्याविरोधात आता ग्रामस्थ ठामपणे उभे राहू लागले आहेत. त्यामुळे अशा पुढाऱ्यांविरोधात पोलिसांकडे अर्जही करण्यात आले आहेत.लोकांना रोजगार हवा असल्याने आता रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन उघडउघड केले जात आहे. म्हणूनच काही ठराविक लोक ते हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्यांच्याविरोधात स्थानिक लोकच उभे राहत असल्याने या स्वयंघोषित पर्यावरणरक्षकांचे काय होणार आणि जिल्हा प्रशासन, पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

एनजीओकडून चर्चाच नाही..रिफायनरी प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध करणार्या स्वयंसेवी संस्थांनी आतापर्यंत कधीही आपल्या शंका, आक्षेप संबंधित कंपनीसमोर मांडलेले नाहीत. आपण म्हणतो तेच खरे आहे, अशी भूमिका घेत या संस्थांनी कधीही चर्चा करण्यात स्वारस्य दाखवलेले नाही. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

सगळीकडे तेच कसे?ज्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा झाली, तेव्हा जे लोक विरोध करण्यासाठी पुढे होते, तेच लोक नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी उभे राहिले. आता बारसूमध्येही तेच लोक विरोध करत आहेत. त्यांना असे करण्यासाठी कोणाकडून नियुक्त केले गेले आहे का, असा प्रश्नही आता लोक करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्प