शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

खेडमध्ये पंधरा वाड्यात केवळ एकच टँकर-लांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:36 IST

खेड : तालुक्यात पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. सध्या तालुक्यातील आठ गावातील पंधरा वाड्यांमध्ये एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ...

ठळक मुद्देपाणीटंचाईची झळ : प्रशासनाची दमछाकलांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक  पालू ग्रामस्थांनी टँकर अडवला

खेड : तालुक्यात पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. सध्या तालुक्यातील आठ गावातील पंधरा वाड्यांमध्ये एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. साडेपाच हजार लीटर क्षमतेचा एकच टँकर उपलब्ध असल्याने प्रशासनाची टँचाईग्रस्त गावातील जनतेला पाणीपुरवठा करताना दमछाक होत आहे. त्यामुळे दोन खासगी टँकरची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी जिल्ह्यातील पहिला टँकर खेड तालुक्यात धावतो. मात्र, यावर्षी यामध्ये खंड पडला आहे. सध्या उन्हाळा वाढला असल्याने ग्रामीण भागातील जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. उन्हाच्या तीव्रतेने ग्रामीण भागातील जलस्रोत झपाट्याने आटत आहेत. परिणामी तालुक्यात सध्या आठ गावे व १५ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, प्रशासनाकडे साडेपाच हजार लीटरचा एकच टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे टँचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. टँचाईग्रस्त गावांना चोरद नदीपात्रातून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

दिवसागणिक टंचाईग्रस्त गावे व त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे टँकरद्वारे तालुक्यातील सर्व गावांना पाणी पुरवठा कसा करावा, हा प्रश्न पंचायत समिती प्रशासनासमोर उभा राहिला आहे. सध्या प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने व तहसीलदार शिवाजी जाधव लोकसभा निवडणूक प्रक्रियेत गुंतले असल्याने खासगी टँकरच्या उपलब्धतेसाठी विलंब होत असल्याचे समजते. तालुक्यातील जनतेसाठी दोन खासगी टँकर उपलब्ध झाल्यास टँचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे.

 

लांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक  पालू ग्रामस्थांनी टँकर अडवला

लोकमत न्यूज नेटवर्क

लांजा : तालुक्यातील पालू गावामध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, ग्रामस्थांनी मागणी करुनही प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे बुधवारी हुंबरवणे येथे पाणीपुरवठा करण्यासाठी आलेल्या शासकीय टँकरला ग्रामस्थांनी दिवसभर घेराओ घालत अडवून धरले होते. जोपर्यंत प्रशासन पालू गावाला पाणी देत नाही, तोपर्यंत टँकर न सोडण्याचा पवित्रा पालू ग्रामस्थांनी घेतला होता.

तालुक्यातील हुंबरवणे गावामध्येही भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांची  मागणी लक्षात घेत प्रशासनाने एक दिवस आड करून गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रथम चिंचुर्टी व त्यानंतर हुंबरवणे गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, त्या शेजारीच असणाºया पालू येथील ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

पालू गावातील सात वाड्यांवर दोन ते तीन दिवस आड करुन पाणी पिण्याची वेळ आली आहे. पालू गावामध्ये चार विहिरी असून, या विहिरी पूर्णत: कोरड्या पडल्या आहेत. याच विहिरींवर ग्रामपंचायतीची नळपाणी योजना अवलंबून आहे. 

पालू गावातील गावकारवाडी, दंडावरचीवाडी, बौद्धवाडी, गाडेवाडी, रामवाडी, पानंदी खालचीवाडी, नामेवाडी अशा सात वाड्यांतील ग्रामस्थांच्या घशाला पाण्याविना कोरड पडली आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

दरम्यान, हुंबरवणे येथे बुधवारी सकाळी शासकीय टँकर पाणी घेऊन गेला होता. यावेळी संतप्त झालेल्या पालू येथील ग्रामस्थांनी या  टँकरला अडवले. जोपर्यंत प्रशासन पालू गावात पाण्याचा टँकर पाठवत नाही, तोपर्यंत आम्ही हा टँकर सोडणार नाही, असा पवित्रा पालू ग्रामस्थांनी घेतला होता. त्यामुळे टँकर दिवसभर जाग्यावरच उभा होता. याबाबतची माहिती लांजा पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाला दिल्याची माहिती सरपंच सुहास नामे यांनी दिली.

पालू गावातील विहिरींमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने प्रशासनाला कळवल्यामुळेच तालुका प्रशासनाने पालू गावामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केलेला नाही. मात्र, प्रत्यक्षात ग्रामस्थ पाणी नसल्याने पाणी पाणी करत आहेत.पालू गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असून, आतापर्यंत अनेकवेळा मागणी करूनही प्रशासनाने या गावासाठी टँकर पुरवलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwater shortageपाणीटंचाई