शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

एकच जिद्द..रिफायनरी रद्द; रिफायनरी विरोधात राजापूर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:36 IST

आजच रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.

राजापूर : एकच जिद्द .. रिफायनरी रद्द यासह शिवसेनेचे मंत्री, आमदार यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत आज बुधवारी रिफायनरी विरोधकांनी राजापूर तहसील कार्यालयावर केंद्र शासनाच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात मोर्चा काढून आपला विरोध दर्शवला. तर, धोपेश्वर बारसु परिसरात शिवसेनाच या प्रकल्पासाठी आग्रही असल्यामुळे या मोर्चात शिवसेनाविरोधी घोषणाच अधिक देण्यात आल्या.

दरम्यान, आजच रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.

केंद्र सरकारच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला या अगोदर नाणार परिसरात विरोध करण्यात आला होता. त्यावेळी काही एनजीओंच्या माध्यामातून येथील स्थानिकांच्या मनात या रिफायनरी प्रकल्पाबाबत गैरसमज पसरवण्यात आले होते. यात शिवसेनेनेही उडी घेत प्रकल्पाला विरोध करत युतीच्या शासनाला प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसुचना रद्द करण्यास भाग पाडले होते . २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर युतीसाठी भाजपाने ही अधिसुचना रद्द केली होती. त्यानंतर रिफायनरी प्रकल्पाचा प्रश्न काही अंशी थांबला होता . मात्र दरम्यानच्या काळात नाणार परिसरातील स्थानिक प्रकल्प समर्थक शेतकऱ्यांनी सुमारे साडेआठ हजार एकर जमीन या रिफायनरी प्रकल्पासाठी देण्याची तयारी असल्याचे संमतीपत्रे शासनाकडे सादर केली होती. तरीही विरोधात उतरलेल्या शिवसेनेने रिफायनरी विरोधाचा हेका कायम ठेवत नाणार जाणार म्हणजे जाणार अशी घोषणा दिली होती. त्यानंतर या प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय झाले होते.

दरम्यानच्या काळात शिवसेनेने धोपेश्वर बारसु परिसरात मिनी औद्योगिक वसाहतीसाठी अधिसुचना जाहीर केली होती. त्यानंतर या परिसरात रिफायनरी प्रकल्प हलवण्याची तयारी सुरु केली. या धोपेश्वर बारसु परिसरातील जनतेने या प्रकल्पाला पाठिंबा देत समर्थन केले व तशी मागणी शासनाकडे एकमुखाने केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी रिफायनरी होण्याचे संकेत दिले. गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर असणारे आदित्य ठाकरे यानी मंगळवारी पुन्हा राजापूर येथे या प्रकल्पाचे सुतोवाच केले. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधाचा सूर आळवण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पRajapurराजापुर