शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:59 IST

state transport, mumbai, bestservis, ratnagiridepot बृहन्मुंबई महानगरपालिकेतंर्गत सुरू असलेल्या बेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या रवाना होणार आहे. याशिवाय दोनशे चालकवाहकांची जोडी मिळून ४०० कर्मचारी देखील रवाना होणार आहेत. सकाळ व संध्याकाळ सत्रातील फेऱ्यांसाठी चालक वाहकांच्या स्वतंत्र दोनशे जोड्या कार्यरत राहणार आहेत.

ठळक मुद्देबेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या४०० चालक-वाहकही मुंबईत जाणार

रत्नागिरी : बृहन्मुंबई महानगरपालिकेतंर्गत सुरू असलेल्या बेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या रवाना होणार आहे. याशिवाय दोनशे चालकवाहकांची जोडी मिळून ४०० कर्मचारी देखील रवाना होणार आहेत. सकाळ व संध्याकाळ सत्रातील फेऱ्यांसाठी चालक वाहकांच्या स्वतंत्र दोनशे जोड्या कार्यरत राहणार आहेत.कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवा बजाविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी राज्य परिवहन महामंडळाने एप्रिलमध्ये मदत केली होती. त्यावेळी रत्नागिरी विभागातील एकूण ३२ जणांची टीम मुंबईला रवाना झाली होती. लॉकडाऊन कालावधीत डॉक्टर्स, नर्सेस, शासकीय रुग्णालयातील इतर कर्मचाºयांची विशेष वाहतूक सुरू करण्यात आली होती.सध्या एकूणच भारमानाअभावी एसटीच्या फेऱ्यांवर परिणाम झाल्याने महामंडळाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागाने बेस्टच्या मदतीसाठी चालक वाहकांसह शंभर गाड्या मुंबईत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात या गाड्या घेऊन चालक वाहक मुंबईकडे रवाना होणार आहेत.

कोरोना संकटकाळातही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. लॉकडाऊनमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. आधीच तोट्यात असलेले महामंडळ आर्थिक संकटात सापडले. प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी भारमाना अभावी दररोजचा तोटा सोसावा लागत आहे. गेले तीन महिने महामंडळाचे कर्मचारी विना वेतन कार्यरत आहेत.

महामंडळाच्या सूचनेनुसार बेस्ट साठी शंभर गाड्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. चारशे चालक व वाहकांनाही पाठविण्याची सूचना असल्याने कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात कर्मचारी गाड्या घेवून मुंबईकडे रवाना होणार आहेत.- अनिल मेहत्तर, विभागीय वाहतूक अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरीBESTबेस्ट