शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

एकेकाळी टंचाईग्रस्त असलेल्या गावाची जलमित्र पुरस्काराला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 18:05 IST

टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे

दापोली : टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे गावाने जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्यावर्षी सन २०१५-२०१६मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या या गावाने केलेल्या उत्कृष्ट कामाची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे.गावाने केलेल्या कामाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दुसरीकडे या गावातील जलयुक्त शिवार अभियानामुळे शिवारातील पाणीपातळीत कमालीची वाढ होऊन मोहिमेचे फलित आता गावात जाणवू लागले आहेत.

समुद्रकिनारपट्टीवर असलेल्या कर्दे गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र तर दुस-या बाजूला प्रचंड डोंगर उतार अशा विचित्र भोगोलिक परिस्थितीत वसलेल्या या गावातील शिवारात पावसाचे पाणी साचून न राहता थेट समुद्र्राला जाऊन मिळत होते. अशा परिस्थितीत गावाला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवून पाणीटंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत होता. परंतु जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याचवर्षी या गावाची निवड जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झाली व गावाचे भाग्यच उजाळले.

या मोहिमेअंतर्गत शिवारात तीन सिमेंट बंधारे, मातीचे दोन बंधारे, दगडी बंधारे, सलग समतल चर, गॅबियन बंधारे विविध कामाच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठविण्यात आले. पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविण्यात येऊ लागल्याने शिवारातील पाणीसाठ्यात वाढ झाली. पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्यातून कायमस्वरूपी सुटका झाली आहे. पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे नारळ, आंबा-काजूच्या बागांना मुबलक पाणी उपलब्ध झाले असून बागायती शेतक-यांना अधिक उत्पन्न मिळायला लागले आहे. गावाच्या पाणीटंचाईबरोबरच शेतकºयांच्या अर्थकारणालाही बळकटी मिळाली आहे .

गावाशेजारी असणा-या डोंगरात सलग समतल चर मारण्यात आल्याने डोंगरातील पाणी त्याचठिकाणी अडविले जाते. डोंगर उत्तरातील पाणी कधीकाळी वाहून जात होते. मात्र आता पावसाचे पाणी अडविण्यात यश आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे गावाने उत्कृष्ट काम करून जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार पटकावला आहे. कर्दे गावाने कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करून या समस्येतून सुटका करून घेतली आहे. तालुक्यात अजून काही गावे टंचाई ग्रस्त आहेत. अशा गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात होऊन, तालुकाटंचाई मुक्त व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याचवर्षी दापोली तालुक्यातील वनौशीतर्फे पंचनदी या गावाने जिल्हास्तरीय द्वितीय, व कर्दे गावाने उत्कृष्ट काम करून जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. या गावाने मोहिमेत दाखविलेला लोकसहभागसुद्धा तितकाच महत्वाचा आहे. जलयुक्त शिवार अभियान मोहीम शेतक-यांसाठी खूप उपयुक्त असून पुढील काळात दूरगामी फलित या योजनेचे आढळून येतील.मुरलीधर नागदिवे, तालुका कृषी अधिकारी, दापोली

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारGovernmentसरकारRam Shindeप्रा. राम शिंदे