शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी पहाटला तरुणांनी घेतला कातळशिल्प, पाणवटे, आडवाटांवरील देवतांचा शोध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:26 IST

कातळ म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य. असे असताना गुराख्यांना, जनावरांना बारा महिने पाणी पुरविणाऱ्या पाण्याच्या दगडी टाक्यांना यावेळी भेट देण्यात आली.

रत्नागिरी : खरेतर दिवाळी पहाटेला शहरी संस्कृतीत गाण्यांच्या मैफिली आयोजित केल्या जातात, मात्र सड्ये गावातील शालेय मुले, तरुणांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सड्यावर पदयात्रा काढून प्राचीन कातळशिल्प, रखरखीत कातळावरील बाराही महिने पाणी देणारे पाणवटे, आडवाटांवरील दुर्गम देवतांचा शोध घेतला. यावेळी कातळशिल्पांचे संवर्धन व्हावे, या हेतूने त्यांना संरक्षण व रेखाचित्रणही करण्यात आले.सड्ये गावातील मुले, तरुणांनी ही पदयात्रा पार पडली. गावातील ज्येष्ठ नागरिक दत्ताराम खवळे आणि अनंत धुमक यांनी या पदयात्रेच्या आडवाटांचे मार्गदर्शन केले. सुरुवातीला माचाण या ठिकाणी भेट देण्यात आली. त्यानंतर सोमेश्वर देवस्थानच्या देवराईला भेट देण्यात आली. गुराख्यांचे अर्थात जांगल्यांचे देवस्थान असलेल्या जांगलदेव याठिकाणी भेट देण्यात आली. कातळ म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य. असे असताना गुराख्यांना, जनावरांना बारा महिने पाणी पुरविणाऱ्या पाण्याच्या दगडी टाक्यांना यावेळी भेट देण्यात आली. रखरखित उन्हातल्या या टाक्यांमध्ये आजही बारा महिने थंडगार पाणी टिकून असल्याचे दिसले.कातळशिल्प हा कोकणच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा. सड्ये-पिरंदवणेच्या सड्यावरिल कातळशिल्प शोधण्याचा यावेळी मुलांनी प्रयत्न केला. यावेळी ‘भेकर’ हा प्राणी आणि ‘माणूस’ ही दोन कातळशिल्पे सड्यावरील कातळात आढळली. मुलांनी त्यावरील माती, रान काढून साफ केली व त्यांच्या रेखांना रंगकाम करुन ती सुस्पष्ट केली. तसेच त्यांचे संवर्धन व्हावे, याकरिता त्यांना दगडी संरक्षण केले.त्यानंतर कोकणातील प्रमुख मातृदेवता श्री भराडीण क्षेत्राला भेट देण्यात आली. याठिकाणच्या कातळावर असलेल्या ३५ फूट लांब असलेल्या आडालाही भेट देण्यात आली. याही आडात बाराही महिने पाणी असते. भराडणीची घाटी उतरुन टोळवाड परिसरातील पेशववकालीन उजव्या सोंडेचे माेरेश्वर देवस्थान तसेच भावे आडम गावचे देवस्थान श्री सप्तेश्वर या देवस्थानाला भेट देण्यात आली. याचठिकाणी क्षेत्रदेवता म्हणून वसलेल्या जाखमाता देवस्थानाला भेट देण्यात आली.त्यानंतर या यात्रेची सांगता करण्यात आली. अनंत धुमक, मारुती धुमक, अमोल पालये यांनी या पदयात्रेचे आयोजन केले होते. या पदयात्रेत हितेश नार्वेकर, सुरज माने, गुरुनाथ धुमक, रोशनी पालये यांच्यासह शालेय विद्यार्थी, तरुण सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी