शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा विणीचा हंगाम लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 16:53 IST

Olive Ridley turtles wildlife Ratnagiri- हिवाळा सुरू झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरुवात होते. मात्र, यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोनवेळा समुद्राच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेले कमीदाबाचे पट्टे यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही किनारपट्टीवर कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाहीत. यावर्षी ऑलिव्ह रिडले विणीचा हंगाम लांबला आहे.

ठळक मुद्देऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा विणीचा हंगाम लांबला

मंदार गोयथळेअसगोली : हिवाळा सुरू झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरुवात होते. मात्र, यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोनवेळा समुद्राच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेले कमीदाबाचे पट्टे यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही किनारपट्टीवर कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाहीत. यावर्षी ऑलिव्ह रिडले विणीचा हंगाम लांबला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास, दापोली तालुक्यातील आंजर्ले, कोळथरे, केळशी, कद्रे, लाडघर, पाडले, मुरुड, दाभोळ, गुहागर तालुक्यातील गुहागर आणि तवसाळ, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी आणि राजापूर तालुक्यातील माडबन व वाडावेत्ये या १४ गावांतील समुद्र किनाऱ्यांवर वन विभागामार्फत ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहीम राबवली जाते.२०१९-२०२० या कालावधित रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर ६५२ घरट्यातील ६५८५३ अंडी वन विभागाने संरक्षित केली होती. त्यापैकी ३२४३३ अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांना सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात वन विभागाला यश आले. यावर्षीही वन विभागाने जिह्यात कासव संवर्धन मोहिमेची तयारी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू केली. परंतु, डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील १४ किनाऱ्यांपैकी एकाही किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाहीत.याबाबत बोलताना ऑलिव्ह रिडले जीवनचक्र अभ्यासक माधव मुधोळ म्हणाले की, मुळात गेल्या तीन-चार वर्षांचा अभ्यास केला, तर अंडी देण्याचा कालावधी पुढे सरकत असल्याचे लक्षात येत आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे त्याचे सामान्य कारण असल्याचे ते म्हणाले. बदलत्या वातावरणामुळे पक्षी-प्राण्यांच्या आयुष्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत, हेच यातून दिसत आहे.हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर सापडली अंडीनाताळच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचे घरटे वन विभागाला सापडले आहे. या घरट्यातून १३८ अंडी संरक्षित करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर या हंगामात सापडलेले हे पहिले घरटे आहे. जानेवारी महिन्यापासून कोकण किनारपट्टीवर विणीचा हंगाम सुरू होईल, असा अंदाज आहे.

निसर्ग वादळामुळे समुद्रही ढवळून निघाला. त्यानंतरही पश्चिम उत्तर समुद्रात दोनवेळा चक्रीवादळ झाले. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे थंडी उशिरा पडली. डिसेंबर महिन्यात पाऊस पडला. या सर्वांचा परिणाम कासवांच्या जीवनचक्रावरही झाला आहे. ती इतस्तत: विखुरली गेल्याने त्यांच्या मीलनाचा काळ लांबला. स्वाभाविकच अंडी घालण्याचा काळही लांबला आहे. जानेवारीत विणीचा हंगाम सुरू होईल.- माधव मुधोळ, अभ्यासक

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी