शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

रूग्णसंख्या कमी होतानाच कोरोनाबाधितांचे मृत्यूही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:52 IST

coronavirus, death, ratnagirinews ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात केवळ ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.७४ टक्के इतके झाल्याने त्यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. गेल्या दहा दिवसात मृतांच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण ३१८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात निम्म्याहून कमी बळीआरोग्य विभागाला मोठे यश, ताण झाला कमी

रहिम दलालरत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात केवळ ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.७४ टक्के इतके झाल्याने त्यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. गेल्या दहा दिवसात मृतांच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण ३१८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली होती. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सप्टेंबर, २०२० पर्यंत कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या ७४०८ इतकी होती, तर ऑक्टोबर महिन्यात १०४१ रुग्णांची भर पडली होती. चालू महिन्याच्या गेल्या १० दिवसांत केवळ ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण ८५३१ झाले आहेत.कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. सप्टेंबर महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३८ होते, तर त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आणखी वाढ होऊन ते ९३.२६ टक्के इतके झाले. गेल्या १० दिवसात रुग्ण पॉझिटिव्ह मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे होण्याचे प्रमाणही ९४.४७ टक्के इतके आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित २६३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूचे प्रमाण ३.५५ होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात ५३ कोरोनाबाधित रुग्ण मृत झाल्याने एकूण मृतांची संख्या ३१६ झाली आहे. रुग्ण मिळण्याच्या प्रमाणात घट झालेली असल्याने मृतांच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊन प्रमाण ३.७७ टक्के झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या गेल्या १० दिवसांत कोरोनाने केवळ २ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या ३१८ झाली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यामध्ये आरोग्य विभागाला यश आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राजापूर तालुक्यात सध्या एकही रूग्ण नाही. आता कोरोना निर्मूलनाच्या दिशेने जिल्ह्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूRatnagiriरत्नागिरी