शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णसंख्या कमी होतानाच कोरोनाबाधितांचे मृत्यूही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:52 IST

coronavirus, death, ratnagirinews ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात केवळ ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.७४ टक्के इतके झाल्याने त्यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. गेल्या दहा दिवसात मृतांच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण ३१८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात निम्म्याहून कमी बळीआरोग्य विभागाला मोठे यश, ताण झाला कमी

रहिम दलालरत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात केवळ ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.७४ टक्के इतके झाल्याने त्यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. गेल्या दहा दिवसात मृतांच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण ३१८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली होती. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सप्टेंबर, २०२० पर्यंत कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या ७४०८ इतकी होती, तर ऑक्टोबर महिन्यात १०४१ रुग्णांची भर पडली होती. चालू महिन्याच्या गेल्या १० दिवसांत केवळ ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण ८५३१ झाले आहेत.कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. सप्टेंबर महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३८ होते, तर त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आणखी वाढ होऊन ते ९३.२६ टक्के इतके झाले. गेल्या १० दिवसात रुग्ण पॉझिटिव्ह मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे होण्याचे प्रमाणही ९४.४७ टक्के इतके आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित २६३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूचे प्रमाण ३.५५ होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात ५३ कोरोनाबाधित रुग्ण मृत झाल्याने एकूण मृतांची संख्या ३१६ झाली आहे. रुग्ण मिळण्याच्या प्रमाणात घट झालेली असल्याने मृतांच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊन प्रमाण ३.७७ टक्के झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या गेल्या १० दिवसांत कोरोनाने केवळ २ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या ३१८ झाली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यामध्ये आरोग्य विभागाला यश आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राजापूर तालुक्यात सध्या एकही रूग्ण नाही. आता कोरोना निर्मूलनाच्या दिशेने जिल्ह्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूRatnagiriरत्नागिरी