शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

पाणीपुरवठा योजनांसाठी आता लोकवर्गणीची अट रद्द

By admin | Updated: July 29, 2014 23:03 IST

पाणी गुणवत्ता कार्यशाळा : ग्रामीण भागातील पाणी योजनांना उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : नळपाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीसारखा कोणताही आर्थिक भार जनतेवर न लादता ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.पंचायत समितीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या श्यामराव पेजे सभागृहात आयोजित पाणी गुणवत्ता कार्यक्रम तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर, प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे, गटविकास अधिकारी जे. डी. साखरे, उपसभापती योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये आदी उपस्थित होते. रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्रातील आठ गावांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बावनदीतील पाणी आणण्यासाठी शासनाने नुकतीच ५७ कोटी रुपयांच्या निधीला त्वरित मान्यता दिली आहे. त्यामुळे जनहिताची विकासकामे करत असताना जात, पात, धर्म, पक्ष विसरुन ग्रामस्थांनी एकत्रित विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. जनहिताची कामे करत असताना निकोप स्पर्धेच्या माध्यमातून दर्जेदार कामाचा आग्रह समाजातील प्रत्येक घटकाचा असला पाहिजे. दर्जेदार कामांसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी योग्य समन्वयाद्वारे कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच जनहिताचे निर्णय घेऊन दर्जेदार विकासाची कामे करणाऱ्या अधिकारीवर्गालाही प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यशाळेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, अन्य विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद पाणी पुरवठा व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कार्यशाळेत भाग घेतला. (शहर वार्ताहर)