शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
4
अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले सिवानचे जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
5
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
6
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
7
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
8
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
9
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
10
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
11
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
12
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
13
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
14
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
15
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
16
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
17
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
18
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
19
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
20
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...

पाणीपुरवठा योजनांसाठी आता लोकवर्गणीची अट रद्द

By admin | Updated: July 29, 2014 23:03 IST

पाणी गुणवत्ता कार्यशाळा : ग्रामीण भागातील पाणी योजनांना उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : नळपाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीसारखा कोणताही आर्थिक भार जनतेवर न लादता ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.पंचायत समितीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या श्यामराव पेजे सभागृहात आयोजित पाणी गुणवत्ता कार्यक्रम तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर, प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे, गटविकास अधिकारी जे. डी. साखरे, उपसभापती योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये आदी उपस्थित होते. रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्रातील आठ गावांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बावनदीतील पाणी आणण्यासाठी शासनाने नुकतीच ५७ कोटी रुपयांच्या निधीला त्वरित मान्यता दिली आहे. त्यामुळे जनहिताची विकासकामे करत असताना जात, पात, धर्म, पक्ष विसरुन ग्रामस्थांनी एकत्रित विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. जनहिताची कामे करत असताना निकोप स्पर्धेच्या माध्यमातून दर्जेदार कामाचा आग्रह समाजातील प्रत्येक घटकाचा असला पाहिजे. दर्जेदार कामांसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी योग्य समन्वयाद्वारे कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच जनहिताचे निर्णय घेऊन दर्जेदार विकासाची कामे करणाऱ्या अधिकारीवर्गालाही प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यशाळेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, अन्य विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद पाणी पुरवठा व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कार्यशाळेत भाग घेतला. (शहर वार्ताहर)