शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही, रत्नागिरीत धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:03 IST

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यात आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी आंदोलने, निवेदने देऊनही अद्याप ठोस कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शुक्रवारी आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सादर करण्यात आले.सन २०१५ पासून थकीत कर्ज असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ११,३२६ असून, थकबाकीची रक्कम २२३.८६ कोटी आहे. अशा शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आंबा, काजू बागायतदारांची संपूर्ण कर्जाची सरसकट माफी करून सातबारा कोरा करत त्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात आली आहे.सन २०१४-१५ मध्ये अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असल्याने कर्ज नियमित न भरल्याने व्याजमाफीची मागणी करण्यात आली होती. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची व्याज माफी करण्यात आली. मात्र, शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. पुनर्गठणाची सहा टक्क्यांप्रमाणे व्याजमाफी न देता १२ टक्क्यांप्रमाणे रक्कम वसूल करून बागायतदारांवर अन्याय करण्यात आला आहे.

विद्यमान फळपीक विमा योजना सदोष असून, त्याचे निकष बदलण्याची आवश्यकता आहे. कृषी बिलामध्ये झालेली वाढ तत्काळ थांबवून पूर्वीप्रमाणे कृषी पंपाची बिल आकारणी करण्यात यावी. आंबा व काजू हे कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून, कोकणची अर्थव्यवस्था या पिकावर अवलंबून आहे.कोकणातील आंबा बागायतदारांची कर्जमुक्ती करून त्यांना आत्महत्या करण्यापासून वाचवावे. तसेच, ७/१२ कोरा करून शेतकऱ्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. याबाबत वेळीचे योग्य निर्णय न घेतल्यास दि. २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. धरणे आंदोलनात रत्नागिरी जिल्हा आंबा बागायतदार संघटनेेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, प्रकाश साळवी, तुकाराम घवाळी, दीपक राऊत, नंदकुमार मोहिते तसेच अन्य बागायतदार सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाagitationआंदोलन