शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही, रत्नागिरीत धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:03 IST

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यात आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी आंदोलने, निवेदने देऊनही अद्याप ठोस कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शुक्रवारी आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सादर करण्यात आले.सन २०१५ पासून थकीत कर्ज असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ११,३२६ असून, थकबाकीची रक्कम २२३.८६ कोटी आहे. अशा शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आंबा, काजू बागायतदारांची संपूर्ण कर्जाची सरसकट माफी करून सातबारा कोरा करत त्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात आली आहे.सन २०१४-१५ मध्ये अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असल्याने कर्ज नियमित न भरल्याने व्याजमाफीची मागणी करण्यात आली होती. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची व्याज माफी करण्यात आली. मात्र, शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. पुनर्गठणाची सहा टक्क्यांप्रमाणे व्याजमाफी न देता १२ टक्क्यांप्रमाणे रक्कम वसूल करून बागायतदारांवर अन्याय करण्यात आला आहे.

विद्यमान फळपीक विमा योजना सदोष असून, त्याचे निकष बदलण्याची आवश्यकता आहे. कृषी बिलामध्ये झालेली वाढ तत्काळ थांबवून पूर्वीप्रमाणे कृषी पंपाची बिल आकारणी करण्यात यावी. आंबा व काजू हे कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून, कोकणची अर्थव्यवस्था या पिकावर अवलंबून आहे.कोकणातील आंबा बागायतदारांची कर्जमुक्ती करून त्यांना आत्महत्या करण्यापासून वाचवावे. तसेच, ७/१२ कोरा करून शेतकऱ्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. याबाबत वेळीचे योग्य निर्णय न घेतल्यास दि. २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. धरणे आंदोलनात रत्नागिरी जिल्हा आंबा बागायतदार संघटनेेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, प्रकाश साळवी, तुकाराम घवाळी, दीपक राऊत, नंदकुमार मोहिते तसेच अन्य बागायतदार सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाagitationआंदोलन