शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही, रत्नागिरीत धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:03 IST

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यात आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी आंदोलने, निवेदने देऊनही अद्याप ठोस कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शुक्रवारी आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सादर करण्यात आले.सन २०१५ पासून थकीत कर्ज असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ११,३२६ असून, थकबाकीची रक्कम २२३.८६ कोटी आहे. अशा शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आंबा, काजू बागायतदारांची संपूर्ण कर्जाची सरसकट माफी करून सातबारा कोरा करत त्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात आली आहे.सन २०१४-१५ मध्ये अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असल्याने कर्ज नियमित न भरल्याने व्याजमाफीची मागणी करण्यात आली होती. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची व्याज माफी करण्यात आली. मात्र, शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. पुनर्गठणाची सहा टक्क्यांप्रमाणे व्याजमाफी न देता १२ टक्क्यांप्रमाणे रक्कम वसूल करून बागायतदारांवर अन्याय करण्यात आला आहे.

विद्यमान फळपीक विमा योजना सदोष असून, त्याचे निकष बदलण्याची आवश्यकता आहे. कृषी बिलामध्ये झालेली वाढ तत्काळ थांबवून पूर्वीप्रमाणे कृषी पंपाची बिल आकारणी करण्यात यावी. आंबा व काजू हे कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून, कोकणची अर्थव्यवस्था या पिकावर अवलंबून आहे.कोकणातील आंबा बागायतदारांची कर्जमुक्ती करून त्यांना आत्महत्या करण्यापासून वाचवावे. तसेच, ७/१२ कोरा करून शेतकऱ्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. याबाबत वेळीचे योग्य निर्णय न घेतल्यास दि. २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. धरणे आंदोलनात रत्नागिरी जिल्हा आंबा बागायतदार संघटनेेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, प्रकाश साळवी, तुकाराम घवाळी, दीपक राऊत, नंदकुमार मोहिते तसेच अन्य बागायतदार सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाagitationआंदोलन