शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Ratnagiri: देवदर्शन करुन आले; नवदाम्पत्यात भांडण झाले, वादातून नदीत टाकली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:49 IST

मे महिन्यातच झाले होते लग्न

चिपळूण : शहरातील गांधारेश्वर पुलावरून एका नवदाम्पत्याने वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी घडला. नीलेश रामदास अहिरे (२५), अश्विनी नीलेश अहिरे (२३, मूळ रा. साक्री, जि. धुळे, सध्या पाग नाका, चिपळूण) अशी या दाेघांची नावे आहेत. दिवसभर एनडीआरएफ पथकामार्फत त्यांचा शोध घेण्यात आला. दिवस मावळल्याने तो थांबविण्यात आला. आज गुरुवारी पुन्हा त्यांचा शोध घेण्यात येणार आहे.नीलेश आणि अश्विनी हे पती-पत्नी बुधवारी मोटारसायकलवरून गांधारेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेथे दर्शन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. तो विकोपाला गेल्यानंतर दोघेही सकाळी ११ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशनकडे मोटारसायकलवरून निघाले. मात्र, त्यानंतर ते परत वळून गांधारेश्वर पुलावर आले. मोटारसायकल पुलावरच उभी करताच पत्नी अश्विनी हिने कोणताही विचार न करता पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतली. त्यापाठोपाठ पती नीलेश यानेही पुलावरून नदीत उडी घेतल्याचे परिसरातील काही नागरिकांनी पाहिले.प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोवर पती-पत्नी दोघेही वाशिष्ठीच्या प्रवाहात बुडाले होते. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एनडीआरएफ पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.गांधारेश्वर मंदिराच्या बाजूने एनडीआरएफचे पथक वाशिष्ठी नदीत उतरले. पथकाने त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ते दोघेही सापडले नाहीत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अहिरे कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

मे महिन्यातच झाले होते लग्ननीलेश व अश्विनी यांचा विवाह ८ मे रोजी झाला होता. त्यांचा संसार फुलण्याआधीच कोमेजल्याची चर्चा तेथील नागरिकांमध्ये सुरू होती. नीलेश अहिरे याची चिपळुणातील हॉटेल स्वागतजवळ मोबाइल शॉपी आहे. दोघे पती-पत्नी पागनाका येथे राहत होते. नवदाम्पत्यामध्ये कशावरून वादाची अशी कोणती ठिणगी पडली, ज्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतला, ही बाब मात्र अजून पुढे आलेली नाही.

एनडीआरएफ पथकाची तारांबळया घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ पथकाला वाशिष्ठी नदीतून स्पीड बोट घेऊन जाण्यास जवळपास दीड तासाचा कालावधी लागला. शोध कार्यासाठीचे काही आवश्यक साहित्य तेथे नसल्याने पुन्हा ते आणण्यासाठी पथकातील जवान परत आल्यानंतर शोधमोहीम सुरू झाली.