शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे नव्याने सर्वेक्षण : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: July 22, 2023 18:23 IST

इर्शाळवाडीमध्ये डोंगरच अख्खा सरकला, आता याच दृष्टीकोनातून नव्याने सर्वेक्षण 

रत्नागिरी : दरड कोसळण्याचा आतापर्यंतचा अनुभव म्हणजे डोंगरावरील दगड माती मोठ्या प्रमाणात खाली येते. पण रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये आलेला अनुभव खूपच वेगळा होता. तेथे डोंगरच अख्खा सरकला आहे. त्यामुळे आता याच दृष्टीकोनातून जिल्ह्यातील दरडग्रस्त ठिकाणांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. आठ ते दहा दिवसात त्याचा अहवाल मिळेल, असेही ते म्हणाले.पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेनंतर मंत्री उदय सामंत तेथे मध्यरात्रीच पोहोचले होते. तेथील मदत कार्याला दिशा देतानाच त्यांनी सर्व प्रकार जवळून पाहिला. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आतापर्यंत जेथे कोठे दरड कोसळली, तेथे डोंगरावरील माती, दगड, झाडेझुडपे खाली आले. पण इर्शाळवाडीमध्ये डोंगरच पुढे आला आहे. अपघातग्रस्त वस्ती १५० वर्षांपूर्वीची आहे. असे आतापर्यंत कोकणात कधी झाले नव्हते. असा प्रकार इतरत्रही होऊ शकतो. त्यासाठीच आता नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त भागांचे सर्वेक्षण झाले आहे. तेथे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. लोकांना स्थरलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण हे सर्व आतापर्यंतच्या अनुभवावर आधारित आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे नवाच प्रकार समोर आला आहे. अशा पद्धतीने डोंगरच हलला तर तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळेच आपण जिल्हाधिकारी यांना नव्याने सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलनRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणUday Samantउदय सामंत