शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे नव्याने सर्वेक्षण : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: July 22, 2023 18:23 IST

इर्शाळवाडीमध्ये डोंगरच अख्खा सरकला, आता याच दृष्टीकोनातून नव्याने सर्वेक्षण 

रत्नागिरी : दरड कोसळण्याचा आतापर्यंतचा अनुभव म्हणजे डोंगरावरील दगड माती मोठ्या प्रमाणात खाली येते. पण रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये आलेला अनुभव खूपच वेगळा होता. तेथे डोंगरच अख्खा सरकला आहे. त्यामुळे आता याच दृष्टीकोनातून जिल्ह्यातील दरडग्रस्त ठिकाणांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. आठ ते दहा दिवसात त्याचा अहवाल मिळेल, असेही ते म्हणाले.पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेनंतर मंत्री उदय सामंत तेथे मध्यरात्रीच पोहोचले होते. तेथील मदत कार्याला दिशा देतानाच त्यांनी सर्व प्रकार जवळून पाहिला. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आतापर्यंत जेथे कोठे दरड कोसळली, तेथे डोंगरावरील माती, दगड, झाडेझुडपे खाली आले. पण इर्शाळवाडीमध्ये डोंगरच पुढे आला आहे. अपघातग्रस्त वस्ती १५० वर्षांपूर्वीची आहे. असे आतापर्यंत कोकणात कधी झाले नव्हते. असा प्रकार इतरत्रही होऊ शकतो. त्यासाठीच आता नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त भागांचे सर्वेक्षण झाले आहे. तेथे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. लोकांना स्थरलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण हे सर्व आतापर्यंतच्या अनुभवावर आधारित आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे नवाच प्रकार समोर आला आहे. अशा पद्धतीने डोंगरच हलला तर तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळेच आपण जिल्हाधिकारी यांना नव्याने सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलनRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणUday Samantउदय सामंत