शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनवृध्दीसाठी रत्नागिरीला नवा लूक : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 20:33 IST

Thiba Palace Tourisam Ratnagiri- पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी . जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देथिबा राजवाड्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट म्युझियम मारुती मंदिर सर्कल सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर

रत्नागिरी : पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी शहराला नवा लूक देण्याचा प्रयत्न असून, साळवी स्टॉप ते मांडवी व शहरांतर्गत असलेले चौक वेगळ्या पद्धतीने विकसित करण्याचा मानस आहे.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे तज्ज्ञ प्राध्यापक रत्नागिरीत दाखल झाले होते. त्यांनी थिबा राजवाड्याची पाहणी केली. थिबा राजवाड्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट म्युझियम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तज्ज्ञ प्राध्यापक रत्नागिरी शहरात आले आहेत. त्यांनी थिबा राजवाड्यासह शहरातील मुख्य चौकात मारुती मंदिर सर्कल, श्यामराव पेजे पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सावरकर चौक, मांडवी जेटी आदींची पाहणी केली.मारुती मंदिर सर्कल सुशोभिकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चौकांच्या सुशोभिकरणासाठी पर्यटन, जिल्हा नियोजन त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली जाणार आहे.

टाकाऊपासून कायमस्वरूपी रेखीव काम जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी शहरात करणार आहेत. या सर्वांच्या माध्यमातून शहराला नवा लूक दिला जाणार आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण शहर होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

थिबा राजवाडा जतन, संवर्धनाचे काम थांबले आहे. पुरातत्त्व विभागातर्फे या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्याची सूचना मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.वैयक्तिक कारणराज्यातील लोणेरे, जळगाव येथील दोन विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे दिला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेले वर्षभर ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते. राजकीय हस्तक्षेपामुळे कुलगुरूंनी राजीनामा दिला हे आरोप चुकीचे व खोडसाळ आहे. त्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Thiba Palaceथिबा पॅलेसRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतtourismपर्यटन