शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळी मजुरांनी दोन हजाराने वाढविली मजुरी, आंबा बागायतदारांना आर्थिक भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 12:32 IST

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत असतानाच आंबा काढणी, फवारणी व अन्य कामांसाठी स्थानिक मजूर उपलब्ध होत ...

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत असतानाच आंबा काढणी, फवारणी व अन्य कामांसाठी स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने परराज्यातील नेपाळी मजुरांवर येथील बागायतदारांना अवलंबून राहावे लागत आहे. यावर्षी नेपाळी कमी संख्येने दाखल झाले आहेत. त्यातच गतवर्षीपेक्षा दोन हजार रुपये मजुरीत वाढवून मागत आहेत. मजूर उपलब्ध होत नसल्याने नेपाळ्यांना जास्त पैसे देणे बागायतदारांना भाग पडत आहे.डिसेंबरपासून नेपाळी मजूर यायला सुरुवात होते. माकडे, वानर, आंबा मोहर, फळे खात असल्याने बागायतीचे संरक्षण करण्यासाठी बागांमध्ये नेपाळी सुरक्षारक्षक म्हणून नेमण्यात येतात. केवळ बागेची वन्यप्राण्यांपासून देखरेख करण्यासाठी त्यांना दहा हजार रुपये दिले जात हाेते. मात्र, त्यासाठी या वर्षी बारा हजारांची मागणी केली आहे. बागेच्या देखरेखीसह मजुरीच्या कामासाठी १२ हजार दिले जात हाेते, तिथे आता १४ हजार रुपये महिन्याचा पगार मागत आहेत.फवारणी असो वा झाडावर चढून आंबे काढण्याच्या कामाला स्थानिक मजूर मिळत नसल्याने अखेर नेपाळी मजुरांना दोन हजार रुपये वाढवून देण्याची तयारी बागायतदारांनी केली आहे.बागेच्या रक्षण करण्याच्या कामासह फवारणी असो वा आंबा काढणी किंवा पॅकिंगच्या कामाला तयार होत असल्याने नेपाळी कामगारांना सध्या मागणी अधिक आहे. अनेक नेपाळी ठरावीक बागायतदारांकडे वर्षानुवर्षे कामाला येत आहेत. त्यामुळे बागायतदारांनी केवळ मोबाइलवर संपर्क साधल्यास कामावर हजर होत आहेत. बागेच्या संरक्षणासह साफसफाई, फवारणीच्या कामासाठी नेपाळी दाम्पत्याची नियुक्ती केली जात आहे.

स्थानिकांना रात्रीच्या पहाऱ्याची भीतीआंबा मोहराच्या संरक्षणासाठी फवारणी असो वा आंबा काढणी वेळेवर करणे आवश्यक आहे. अन्यथा बागायतदारांचे नुकसान होते. त्यामुळे सध्या पीक वाचविण्यासाठी बागायतदार खर्च करीत आहेत. आंबा बागेत राहून फळांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक मजूर तयार होत नाहीत. दिवसभर राखण करण्याची तयारी एकवेळ दाखविली जात असली, तरी रात्री मात्र पहारा देण्यासाठी वन्यप्राण्यांच्या भीतीने काेणी तयार होत नाही. नेपाळी मात्र बागेतच राहतात. त्यामुळे नेपाळींना बागेच्या संरक्षणासाठी नियुक्त केली जात आहे.

नवीन पिढी मजूर कामासाठी निरुत्साही असल्याने स्थानिक मजूर मिळत नाहीत. त्यामुळे नेपाळी व उत्तर प्रदेशातील कामगारांवर अवलंबून राहावे लागते. यावर्षी नेपाळी कामगार कमी संख्येने आले असून पगारही वाढवून मागत आहेत. मजुरांची समस्या भासत असल्याने बागायतदारांना नेपाळी मजुरांना वाढीव पगार देणे भाग पडत आहे. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा