शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

नेपाळी मजुरांनी दोन हजाराने वाढविली मजुरी, आंबा बागायतदारांना आर्थिक भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 12:32 IST

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत असतानाच आंबा काढणी, फवारणी व अन्य कामांसाठी स्थानिक मजूर उपलब्ध होत ...

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत असतानाच आंबा काढणी, फवारणी व अन्य कामांसाठी स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने परराज्यातील नेपाळी मजुरांवर येथील बागायतदारांना अवलंबून राहावे लागत आहे. यावर्षी नेपाळी कमी संख्येने दाखल झाले आहेत. त्यातच गतवर्षीपेक्षा दोन हजार रुपये मजुरीत वाढवून मागत आहेत. मजूर उपलब्ध होत नसल्याने नेपाळ्यांना जास्त पैसे देणे बागायतदारांना भाग पडत आहे.डिसेंबरपासून नेपाळी मजूर यायला सुरुवात होते. माकडे, वानर, आंबा मोहर, फळे खात असल्याने बागायतीचे संरक्षण करण्यासाठी बागांमध्ये नेपाळी सुरक्षारक्षक म्हणून नेमण्यात येतात. केवळ बागेची वन्यप्राण्यांपासून देखरेख करण्यासाठी त्यांना दहा हजार रुपये दिले जात हाेते. मात्र, त्यासाठी या वर्षी बारा हजारांची मागणी केली आहे. बागेच्या देखरेखीसह मजुरीच्या कामासाठी १२ हजार दिले जात हाेते, तिथे आता १४ हजार रुपये महिन्याचा पगार मागत आहेत.फवारणी असो वा झाडावर चढून आंबे काढण्याच्या कामाला स्थानिक मजूर मिळत नसल्याने अखेर नेपाळी मजुरांना दोन हजार रुपये वाढवून देण्याची तयारी बागायतदारांनी केली आहे.बागेच्या रक्षण करण्याच्या कामासह फवारणी असो वा आंबा काढणी किंवा पॅकिंगच्या कामाला तयार होत असल्याने नेपाळी कामगारांना सध्या मागणी अधिक आहे. अनेक नेपाळी ठरावीक बागायतदारांकडे वर्षानुवर्षे कामाला येत आहेत. त्यामुळे बागायतदारांनी केवळ मोबाइलवर संपर्क साधल्यास कामावर हजर होत आहेत. बागेच्या संरक्षणासह साफसफाई, फवारणीच्या कामासाठी नेपाळी दाम्पत्याची नियुक्ती केली जात आहे.

स्थानिकांना रात्रीच्या पहाऱ्याची भीतीआंबा मोहराच्या संरक्षणासाठी फवारणी असो वा आंबा काढणी वेळेवर करणे आवश्यक आहे. अन्यथा बागायतदारांचे नुकसान होते. त्यामुळे सध्या पीक वाचविण्यासाठी बागायतदार खर्च करीत आहेत. आंबा बागेत राहून फळांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक मजूर तयार होत नाहीत. दिवसभर राखण करण्याची तयारी एकवेळ दाखविली जात असली, तरी रात्री मात्र पहारा देण्यासाठी वन्यप्राण्यांच्या भीतीने काेणी तयार होत नाही. नेपाळी मात्र बागेतच राहतात. त्यामुळे नेपाळींना बागेच्या संरक्षणासाठी नियुक्त केली जात आहे.

नवीन पिढी मजूर कामासाठी निरुत्साही असल्याने स्थानिक मजूर मिळत नाहीत. त्यामुळे नेपाळी व उत्तर प्रदेशातील कामगारांवर अवलंबून राहावे लागते. यावर्षी नेपाळी कामगार कमी संख्येने आले असून पगारही वाढवून मागत आहेत. मजुरांची समस्या भासत असल्याने बागायतदारांना नेपाळी मजुरांना वाढीव पगार देणे भाग पडत आहे. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा