शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

नीलिमा चव्हाण हिचा घातपात नाही, रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

By अरुण आडिवरेकर | Updated: August 8, 2023 18:44 IST

व्हिसेरा तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

रत्नागिरी : ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर आजवरच्या तपासात प्रथमदर्शनी कोणताही घातपात झाल्याबाबत माहिती अथवा तथ्ये समोर आलेली नाहीत. त्यामुळे हा घातपात नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, व्हिसेरा तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट हाेईल, असेही त्यांनी सांगितले.दापाेलीतील एका बॅंकेत काम करणाऱ्या ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा १ ऑगस्ट राेजी दाभाेळ खाडीत मृतदेह आढळला. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मंगळवारी (८ ऑगस्ट) पत्रकार परिषदेचे आयाेजन केले हाेते. यावेळी अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित हाेत्या.अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले की, २९ जुलै राेजी दापाेली येथून बेपत्ता झालेल्या नीलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभाेळ खाडीत सापडला हाेता. त्यानंतर पाेलिसांनी तिच्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. काही साक्षीदार तपासण्यात आले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार शरीरावर काेणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे समाेर आले आहे. आजवरच्या तपासावरुन तिचा घातपात झालेला नसल्याचा निष्कर्ष समाेर येत आहे. परंतु, या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने पाेलिस तपास करत असून, साक्षीदारांकडे कसून चौकशी सुरु आहे. लवकरच या मृत्यूमागील वस्तुस्थिती समाेर येईल, असे अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.पाेलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले की, तिचा व्हिसेरा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल लवकरात लवकर देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. चार दिवसात हा अहवाल आम्हाला प्राप्त हाेईल आणि त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस