शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

नीलिमा चव्हाण हिचा घातपात नाही, रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

By अरुण आडिवरेकर | Updated: August 8, 2023 18:44 IST

व्हिसेरा तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

रत्नागिरी : ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर आजवरच्या तपासात प्रथमदर्शनी कोणताही घातपात झाल्याबाबत माहिती अथवा तथ्ये समोर आलेली नाहीत. त्यामुळे हा घातपात नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, व्हिसेरा तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट हाेईल, असेही त्यांनी सांगितले.दापाेलीतील एका बॅंकेत काम करणाऱ्या ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा १ ऑगस्ट राेजी दाभाेळ खाडीत मृतदेह आढळला. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मंगळवारी (८ ऑगस्ट) पत्रकार परिषदेचे आयाेजन केले हाेते. यावेळी अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित हाेत्या.अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले की, २९ जुलै राेजी दापाेली येथून बेपत्ता झालेल्या नीलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभाेळ खाडीत सापडला हाेता. त्यानंतर पाेलिसांनी तिच्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. काही साक्षीदार तपासण्यात आले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार शरीरावर काेणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे समाेर आले आहे. आजवरच्या तपासावरुन तिचा घातपात झालेला नसल्याचा निष्कर्ष समाेर येत आहे. परंतु, या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने पाेलिस तपास करत असून, साक्षीदारांकडे कसून चौकशी सुरु आहे. लवकरच या मृत्यूमागील वस्तुस्थिती समाेर येईल, असे अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.पाेलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले की, तिचा व्हिसेरा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल लवकरात लवकर देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. चार दिवसात हा अहवाल आम्हाला प्राप्त हाेईल आणि त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस