शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

एनडीए सरकारची भांडाफोड करणार : अनंत गाडगीळ

By admin | Updated: September 21, 2014 00:50 IST

समविचारी पक्षाशी आघाडी करणार

रत्नागिरी : एन. डी. ए. सरकार न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप, घटनात्मक पदांची अवहेलना, प्रसारमाध्यमांवर दबाव टाकत लोकशाहीच्या सर्व स्तंभांना धक्का देणारे सरकार असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पॅनेल प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केली. विधानसभा निवडणुका लक्षात घेता गेल्या पाच वर्षात राज्यात केलेले भरीव काम लोकांपर्यत पुस्तिका व संवादाद्वारे मांडली जाणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजप, एनडीएकडून जनतेला दिलेली आश्वासने व सद्यस्थिती असलेली घूमजावची भूमिका लोकांसमोर मांडणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.पारदर्शकतेचा बडेजाव करणाऱ्या पंतप्रधानांनी गेल्या तीन परदेश दौऱ्यात एकाही पत्रकाराला सोबत नेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या भाषणात युपीएने गेल्या दहा वर्षात देशाची वाट लावली असल्याचे मोदी सातत्याने म्हणत असत. परंतु भूतानला नुकतीच मोदी यांनी भेट दिली असता भारताने गेल्या दहा वर्षात नेत्रदीपक प्रगती केल्याचे सांगितले. एनडीए नेते महागाईला काँग्रेसला जबाबदार धरतात मात्र सरकार केंद्रात येताच रेल्वे भाड्यात एकदम १४ टक्के वाढ केली, तसेच तेलाच्या किमंतीत वाढ केल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.दहशतवाद्यांच्या हल्लयासाठी युपीए ला जबाबदार धरणाऱ्या एनडीए ने १७ लाख खर्चून झालेल्या मोदींच्या शपथविधीस नवाज शरीफ यांना लाल गालिचा अंथरला, एवढे होवूनही बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी गप्प राहतात, याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला बी.ए.आर.सी ला भेट देतात तेव्हा ‘अणूऊर्जा हीच एकमेव उर्जा’, म्हणतात तेव्हा जैतापूरच्या प्रश्नावर रान उठवू म्हणणारे शांत का ? असा सवालही गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.(प्रतिनिधी)