शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

पावसाळ्यानंतर महायुतीही उतरणार मैदानात - सुनील तटकरे 

By मनोज मुळ्ये | Updated: July 29, 2023 15:25 IST

रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प राज्याच्या, देशाच्या हिताचा असतो, तेव्हा त्यात राजकारण आणता येत कामा नये

रत्नागिरी : प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचा उत्तर भारतीयांचा मेळावा घेत आहेत, ही बाब त्यांच्या पक्षाशी संबंधित आहे. महायुती म्हणून राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना पावसाळ्यानंतर सभा, बैठका सुरू करेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी रत्नागिरीत आलेल्या सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमंशी संवाद साधला. ठाकरे शिवसेना उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहे. त्याविषयी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे महाअधिवेशन घेतले होते. यात पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या दीर्घ भाषणात पक्षाची ध्येयधोरणे मांडली आहेत. त्यानुसारच पक्षाची भूमिका असेल ते म्हणाले. राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार का, असा प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, काही काळ थांबावे लागेल. काळाच्या ओघात त्याची उत्तरे मिळतील.महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला काम करता आले नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. याबाबतच्या प्रश्नावर तटकरे म्हणाले की, अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादांचे योगदान खूप मोठे आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत ते मंत्रालयात काम करत असत. पण त्यांच्या क्षमतेचा उपयोग करुन घेतला गेला नाही.रिफायनरी प्रकल्पाबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका सतत बदलत आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प राज्याच्या, देशाच्या हिताचा असतो, तेव्हा त्यात राजकारण आणता येत कामा नये. जी गोष्ट लोकांच्या हिताची आहे, त्यात पक्षाची भूमिका महत्त्वाची असता नये. एखाद्या प्रकल्पाची गरज, त्याचे फायदे, रोजगाराची उपलब्धता त्याबाबतची सर्व माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची आहे. प्रकल्पाशी निगडीत चांगल्या वाईट गोष्टी लोकांना समजावून सांगायला हव्यात. लोकांचे शंकानिरसन करायला हवे. मात्र रिफायनरीबाबत तसे झाले नाही.

संभाजी भिडेंवर कारवाई व्हावीमहात्मा गांधी यांच्याबद्दल केवळ देशातच नाही तर जगात आदर व्यक्त केला जातो. त्यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी मांडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsunil tatkareसुनील तटकरे