शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

गटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:10 IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलातून नवसंजीवनीची अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.

ठळक मुद्देगटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?सर्वच तालुक्यांना आली आहे मरगळ

रत्नागिरी : जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलातून नवसंजीवनीची अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवून काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीआधी जिल्हाध्यक्ष पदावर बसवले. मूळचे काँग्रेसवासी असलेले कदम हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसपासून दुरावले. २००४ ते २००९ याकाळात ते चिपळूणचे आमदार होते. त्यानंतरच्या काळात भास्कर जाधव यांच्याशी असलेल्या वादामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यात मोठा पुढाकार खासदार हुसेन दलवाई यांचा होता.रमेश कदम यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात पक्षासाठी काहीच ठोस केले नाही, हा आक्षेप त्यांच्यावर घेतला गेला. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात अनेक तालुक्यांमध्ये पक्षाची बैठकच झाली नाही. त्याशिवायच जिल्हा कार्यकारिणी तयार केली गेली. त्यामुळे एका गटाने त्याला जोरदार आक्षेप घेतला. तेथून त्यांच्या विरोधातील वातावरण वाढले.

रमेश कदम यांना पक्षात घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनीच नंतर कदम यांच्या डोक्यावरील हात काढून घेतला. त्यामुळे कदम यांच्याविरोधात तक्रारींचे प्रमाण वाढले होते.आता खेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत एकही पदाधिकारी नसलेल्या काँग्रेसला आता त्यांच्याकडून नवसंजीवनीची अपेक्षा आहे.सर्वच तालुक्यांना आली आहे मरगळसद्यस्थितीत राजापूर वगळता अन्य कोणत्याही तालुक्यात काँग्रेस एकसंध नाही. राजापुरातही गटाचे राजकारण तीव्र आहे. त्यामुळे गटबाजीने त्रस्त झालेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे आणि एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान अ‍ॅड. भोसले यांना पेलावे लागणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी