शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:10 IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलातून नवसंजीवनीची अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.

ठळक मुद्देगटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?सर्वच तालुक्यांना आली आहे मरगळ

रत्नागिरी : जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलातून नवसंजीवनीची अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवून काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीआधी जिल्हाध्यक्ष पदावर बसवले. मूळचे काँग्रेसवासी असलेले कदम हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसपासून दुरावले. २००४ ते २००९ याकाळात ते चिपळूणचे आमदार होते. त्यानंतरच्या काळात भास्कर जाधव यांच्याशी असलेल्या वादामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यात मोठा पुढाकार खासदार हुसेन दलवाई यांचा होता.रमेश कदम यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात पक्षासाठी काहीच ठोस केले नाही, हा आक्षेप त्यांच्यावर घेतला गेला. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात अनेक तालुक्यांमध्ये पक्षाची बैठकच झाली नाही. त्याशिवायच जिल्हा कार्यकारिणी तयार केली गेली. त्यामुळे एका गटाने त्याला जोरदार आक्षेप घेतला. तेथून त्यांच्या विरोधातील वातावरण वाढले.

रमेश कदम यांना पक्षात घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनीच नंतर कदम यांच्या डोक्यावरील हात काढून घेतला. त्यामुळे कदम यांच्याविरोधात तक्रारींचे प्रमाण वाढले होते.आता खेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत एकही पदाधिकारी नसलेल्या काँग्रेसला आता त्यांच्याकडून नवसंजीवनीची अपेक्षा आहे.सर्वच तालुक्यांना आली आहे मरगळसद्यस्थितीत राजापूर वगळता अन्य कोणत्याही तालुक्यात काँग्रेस एकसंध नाही. राजापुरातही गटाचे राजकारण तीव्र आहे. त्यामुळे गटबाजीने त्रस्त झालेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे आणि एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान अ‍ॅड. भोसले यांना पेलावे लागणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी