शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:10 IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलातून नवसंजीवनीची अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.

ठळक मुद्देगटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?सर्वच तालुक्यांना आली आहे मरगळ

रत्नागिरी : जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलातून नवसंजीवनीची अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवून काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीआधी जिल्हाध्यक्ष पदावर बसवले. मूळचे काँग्रेसवासी असलेले कदम हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसपासून दुरावले. २००४ ते २००९ याकाळात ते चिपळूणचे आमदार होते. त्यानंतरच्या काळात भास्कर जाधव यांच्याशी असलेल्या वादामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यात मोठा पुढाकार खासदार हुसेन दलवाई यांचा होता.रमेश कदम यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात पक्षासाठी काहीच ठोस केले नाही, हा आक्षेप त्यांच्यावर घेतला गेला. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात अनेक तालुक्यांमध्ये पक्षाची बैठकच झाली नाही. त्याशिवायच जिल्हा कार्यकारिणी तयार केली गेली. त्यामुळे एका गटाने त्याला जोरदार आक्षेप घेतला. तेथून त्यांच्या विरोधातील वातावरण वाढले.

रमेश कदम यांना पक्षात घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनीच नंतर कदम यांच्या डोक्यावरील हात काढून घेतला. त्यामुळे कदम यांच्याविरोधात तक्रारींचे प्रमाण वाढले होते.आता खेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत एकही पदाधिकारी नसलेल्या काँग्रेसला आता त्यांच्याकडून नवसंजीवनीची अपेक्षा आहे.सर्वच तालुक्यांना आली आहे मरगळसद्यस्थितीत राजापूर वगळता अन्य कोणत्याही तालुक्यात काँग्रेस एकसंध नाही. राजापुरातही गटाचे राजकारण तीव्र आहे. त्यामुळे गटबाजीने त्रस्त झालेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे आणि एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान अ‍ॅड. भोसले यांना पेलावे लागणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी