शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

रत्नागिरीतून बुद्धिबळाचे राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत - प्रसन्न आंबुलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 19:13 IST

भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहा वर्षे खुल्या बुद्धीबळ स्पर्धा घेतल्या जात आहेत.

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी: भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहा वर्षे खुल्या बुद्धीबळ स्पर्धा घेतल्या जात आहेत. या खेळाला ग्लॅमर मिळवून दिले पाहिजे. रत्नागिरीतही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित कराव्यात. रत्नागिरीतून बुद्धिबळाचे राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, ही सप्रे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ क्रीडापटू, चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांनी केले.

केजीएन सरस्वती फाऊंडेशन व चेसमेनतर्फे राणी लक्ष्मीबाई सभागृहात जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आंबूलकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, ऋचा जोशी, सीए उमेश लोवलेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

भारताचे प्रथम राष्ट्रीय विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ के जी एन सरस्वती फाऊंडेशन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस आज रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात प्रारंभ झाला. मूळचे देवरुखचे असलेल्या कै. सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नागिरीत २०१३ सालापासून या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. चेसमेन रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रसन्न आंबूलकर व अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी बुद्धिबळाच्या पटावर प्रतिकात्मक चाली करून स्पर्धेचा शुभारंभ केला. या स्पर्धेत मुंबई, सांगली, सतारा, कोल्हापूर, पुणे, गोवा, कर्नाटक येथून एकूण १०८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी