शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला टक्का, नेमका कुणाला बसणार धक्का

By मनोज मुळ्ये | Updated: May 9, 2024 16:42 IST

आता प्रतीक्षा निकालाची, तोपर्यंत चर्चांना वेग

मनोज मुळ्येरत्नागिरी : दीड महिना सुरू असलेली राजकीय धामधूम मंगळवारी मतदानानंतर संपली असली तरी निकालासाठी आणखी पाऊण महिना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आता कोण जिंकणार, कोण हरणार अशा चर्चांना ऊत आला आहे. जिल्हा क्षेत्र म्हणून विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात ०.२९ टक्के मतदान कमी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १.०९ टक्के इतकेच मतदान वाढले आहे. त्यातही रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सुमारे ३ टक्के मतदान कमी झाले आहे आणि कणकवलीमध्ये सुमारे २ टक्के मतदान वाढले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेले हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याच मुद्द्यावर चर्चा फिरत आहेत.टपाली मतदानासह एकूण मतदान ६३.२० टक्के इतके झाले आहे. गत लोकसभा निवडणुकीत ते ६१.९१ टक्के इतके होते. मतदानामध्ये प्रशासनाला प्रथम श्रेणी मिळाली असली तरी विशेष श्रेणी मिळालेली नाही. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात निरुत्साह दिसून आला. मतदार यादीतील नाव गायब झाले, केंद्र बदलले अशा काही तक्रारी होत्या. मात्र मोठ्या प्रमाणात लोक मतदानासाठी बाहेर पडले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.बुधवारी सायंकाळी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार या मतदारसंघात गतवेळेपेक्षा थोडेच मतदान अधिक झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता राजापूर, कणकवली आणि सावंतवाडी या तीन मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा यावेळी मतदान वाढले आहे तर रत्नागिरी मतदारसंघात ते कमी झाले आहे.

गणिते फायद्यातोट्याची

  • मतदान संपल्यापासूनच मतदानाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार फायद्यातोट्याची गणिते मांडली जात आहेत. कुणाला फायदा होणार आणी कुणाला तोटा यावर अधिक चर्चा होत आहेत.
  • कणकवली मतदारसंघात आमदार भाजपचे म्हणजे महायुतीचे आहेत. त्यामुळे तेथे वाढलेले मतदान महायुतीला फायदेशीर ठरू शकते, असा ढोबळ अंदाज आहे.
  • राजापूर मतदारसंघातील आमदार उद्धवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे आहेत. तेथे आघाडीला फायदा होऊ शकतो.
  • या चर्चा कितीही झाल्या तर सामान्य माणसाचा अंदाज मात्र कोणताही पक्ष देऊ शकत नाही.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narayan Raneनारायण राणेVinayak Rautविनायक राऊत