शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नाणार, सागवे बॉक्साईट उत्खनन; जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित

By मनोज मुळ्ये | Updated: August 9, 2024 19:30 IST

पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : गणेशोत्सव तोंडावर असल्याने नाणार आणि सागवे या दोन्ही बॉक्साईट उत्खननाबाबतची जनसुनावणी अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नाणार, सागवे ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय जाहीर केला. याबाबत जिल्हाधिकारी लवकरच अहवाल देतील, असेही ते म्हणाले.आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नाणार, सागवे, बारसू येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. नाणा येथे २९ ऑगस्टला, तर सागवे येथे ५ सप्टेंबरला बॉक्साइट उत्खननाबाबत जनसुनावणी लावण्यात आली होती. मात्र कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू आहे. त्याच्या थोडाच काळ आधी ही जनसुनावणी का लावण्यात आली आहे, असा प्रश्न या ग्रामस्थांनी केला. सणासुदीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ही जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना ही जनसुनावणी प्रस्तावित केली होती. आता याबाबत प्रांताधिकारी यांना अहवाल तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. सण तसेच पश्चिम घाट हरित क्षेत्र या सर्व गोष्टींचा विचार करुन हा अहवाल तयार केला जाईल. ते आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी राज्य व केंद्र सरकारला अहवाल देतील, असे मंत्री सामंत म्हणाले.बॉक्साईटचा निर्णयही ‘त्यां’चाचज्यांनी रिफायनरीसाठी बारसूची जागा सुचवली, त्यांनीच बॉक्साईट उत्खननाबाबतचा निर्णय घेतला होता. २०१८ सालीच हा निर्णय झाला आहे, असे मंत्री सामंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्प