शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

nanar refinery project: भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची उभारणी, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:19 IST

राजापूर तालुक्यातील रोजगारीची एकूणच स्थिती लक्षात घेता येथील बेरोजगारी दूर करायची असेल तर राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.

राजापूर : कोकणामध्ये मोठा प्रकल्प यावा असा आपला मानस आहे. त्याची उभारणी करताना स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे स्थानिकांसह भूमिपुत्रांशी चर्चा करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजापूर येथे दिली. मात्र, रिफायनरी नाणार येथे हाेणार नाही हे स्पष्ट करत रत्नागिरी जिल्ह्यात अन्य काेठेही प्रकल्प उभारताना स्थानिकांचे मत जाणून घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्गकडून रत्नागिरीकडे जात असताना राजापूरवासीयांसह रिफायनरी समर्थकांनी आदित्य ठाकरे यांची मुंबई-गोवा महामार्गावरील शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली.

यावेळी खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, गटविकास अधिकारी सागर पाटील, रिफायनरी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर, पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिला उपस्थित होत्या.धोपेश्वर, बारसू, सोलगाव परिसरातील रिफायनरी समर्थक मोठ्या प्रमाणावर राजापूर विश्रामधाम येथे उपस्थित होते. त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रकल्प समर्थनाच्या फलकांसह बुलंद घोषणा यावेळी देण्यात आल्या. राजापूर तालुक्यातील रोजगारीची एकूणच स्थिती लक्षात घेता येथील बेरोजगारी दूर करायची असेल तर राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, कोणत्याही प्रकल्पाची उभारणी करताना स्थानिक भूमिपुत्रांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमिपुत्रांना नोकऱ्या, महिलांना रोजगार मिळण्याला प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. या संदर्भात स्थानिकांसह भूमिपुत्रांशी चर्चा करण्याची सूचना संबंधित कंपनीला देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. साऱ्यांना विश्वासात घेऊन, चर्चा करून प्रकल्प उभारणीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरेnanar refinery projectनाणार प्रकल्प