शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: शरीरावर मोजकेच कपडे, अतिप्रसंग नाही, पण..; चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या हत्येचं गूढ वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 18:50 IST

पाच पोलिस पथके तैनात, संगणकातील हार्डडिस्कही चोरीस

चिपळूण : सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणात एकपेक्षा अधिक संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता असून, खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५ पथके तैनात केली आहेत. त्यापैकी एक पथक स्थानिक पातळीवर कार्यरत ठेवण्यात आले असून, अन्य ४ पथके मारेकऱ्यांच्या मागावर आहेत. मारेकऱ्यांनी वर्षा जोशी यांच्या संगणकातील हार्डडिस्क काढून नेली असल्याने पूर्ण नियोजन करून ही हत्या केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.चिपळूण शहरापासून जवळच असलेल्या धामणवणे खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (६३) यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार घटना उघडकीस येण्यापूर्वी सुमारे १० ते १२ तास अगोदर त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच बुधवारी रात्रीच वर्षा जोशी यांचा खून करण्यात आला असल्याचा अंदाज आहे.त्यांच्या शरीरावर काही मोजकेच कपडे असले, तरी कोणताही अतिप्रसंग झालेला नाही. त्यांच्या शरीरावर असलेल्या किरकोळ जखमा या प्रतिकार व झटापटीच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच श्वास कोंडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असल्याचेही शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे.नातेवाइकांकडे चौकशीपोलिसांनी ज्या संशयित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्याची चौकशी पूर्ण करून त्याला सोडून देण्यात आलेले आहे. त्यानंतर शुक्रवारी वर्षा जोशी यांच्या नातेवाइकांनाही चौकशीसाठी बोलावून घेतले होते.चार पथके मारेकऱ्यांच्या मागावरअतिरिक्त पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी चिपळूणमध्ये ठाण मांडून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ५ पथके तयार करण्यात आली असून, एक पथक स्थानिक पातळीवर कार्यरत ठेवण्यात आले आहे, तर अन्य ४ पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्या माध्यमातून देखील काही संशयित हालचाली हाती लागण्याची शक्यता आहे.खुनाचे कारण गुलदस्त्यातचखून नेमका कोणत्या कारणास्तव झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मयत वर्षा जोशी या एकट्याच घरात राहत होत्या. त्यामुळे घरातून कोणते आणि किती साहित्य व दागिने चोरीला गेले किंवा कसे हे स्पष्ट होणे अवघड आहे. त्यामुळे खुनामागचे नेमके कारण अजूनही पुढे आलेले नाही. संशयित ताब्यात आल्यानंतरच त्याचा उलगडा होणार आहे.

पर्यटनची भरपूर आवडवर्षा जोशी यांचा पुनर्विवाह झाला होता, तोही आंतरजातीय पद्धतीचा होता. मात्र २०११ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले व त्यांना मुलं नसल्याने त्या तब्बल १५ वर्षे एकट्याच जीवन व्यतीत होत्या. या कालावधीत पर्यटनानिमित्त त्यांनी विविध ठिकाणी प्रवास केला. देशभरात अनेक ठिकाणी तसेच सिंगापूर व अन्य काही देशातही त्या जाऊन आल्या होत्या. आता हैदराबाद पीठापूर येथे जाऊन आल्यानंतरही त्यांनी सिंगापूरच्या टूरचे नियोजन केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.

तीन प्रकारे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नया घटनेत मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा तीन प्रकारे प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. येथील सीसीटीव्हीचा मुख्य डीव्हीआर गायब आहे. तसेच वर्षा जोशी यांचा मोबाइल पाण्याने भरलेल्या बादलीत फेकून देण्यात आला होता आणि आता त्यांच्या संगणकाची हार्डडिस्कही गायब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी रेकी करून पूर्ण नियोजनाअंती हा खून करण्यात आला असल्याचा पोलिसांना संशय आहे.

काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेजपोलिसांना स्थानिक भागातील काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहेत. त्यातील काही हालचाली लक्षात घेता एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता आहे, अशा निष्कर्षापर्यंत पोलिस आले आहेत. येत्या दोन दिवसांत या प्रकरणाचे मुख्य धागेदोरे उघड होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.