शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीप्रकरणी माझी दिशाभूल, केंद्र सरकारला बारसूबाबत दिलेल्या पत्रावर उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

By मनोज मुळ्ये | Updated: May 6, 2023 18:49 IST

सरकारने हा प्रकल्प कसा चांगला आहे, हे मी जसा लोकांमध्ये उभा राहून बोलत आहे, असे बोलून दाखवावे

राजापूर : रिफायनरीच्या दलालांनी अपुरी माहिती देऊन माझी दिशाभूल केली. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प बारसू येथे उभारण्यासंदर्भातील पत्र आपण केंद्र सरकारला धाडले, असे मत ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राजापूर तालुक्यातील बारसू येथे व्यक्त केले.रिफायनरी प्रकल्प प्रस्ताविक असलेल्या बारसू, सोलगावला शनिवारी ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आपण केंद्र सरकारला बारसूबाबत दिलेले पत्र आणि त्यामागची आपली भूमिका यावरच भर दिला. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी मंत्री अनिल परब, रवींद्र वायकर, पक्षाचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे शिवसेना ग्रामस्थांसोबतच आहे आणि जर बारसूतील ग्रामस्थांना रिफायनरी नको असेल तर या प्रकल्पाला ठाकरे शिवसेनाही ठाम विरोध करेल, असे ते म्हणाले.बारसू येथे माती परीक्षणाचे काम सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी विरोध सुरू केला. तेव्हा सत्तेतील शिवसेनेने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र समोर आणले आणि बारसूतील जागा उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला सुचवली असल्याचे ठामपणे सांगितले. केवळ याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या दौऱ्यात विशेष भर दिला. बारसू भागातील जागेत काहीच पीक घेतले जात नाही. प्रकल्पासाठी घेतल्या जाणाऱ्या जागेत कोणी राहतही नाही, असे आपल्याला रिफायनरीच्या दलालांनी सांगितले. त्यामुळे आपण केंद्र सरकारला रिफायनरी प्रकल्पासाठी बारसूची जागा सुचवणारे पत्र दिले.अर्थात लोकांची डोकी फोडून प्रकल्प राबवा, असे आपण सांगितलेले नाही. लोकांची मते विचारात घेऊनच प्रकल्प राबवायला हवा. जर लोकांना हा प्रकल्प नको असेल तर त्याला ठाकरे शिवसेनेचाही ठाम विरोध असेल, असे त्यांनी सांगितले.आपण बारसूच्या जागेसंदर्भात पत्र दिले. पण त्यात आपल्याला अपुरी माहिती देण्यात आली होती. आपला हेतू चांगला होता. म्हणूनच आपण लोकांसमोर ठामपणे उभे राहून आपली भूमिका मांडत आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले आणि सध्याच्या सरकारने हा प्रकल्प कसा चांगला आहे, हे मी जसा लोकांमध्ये उभा राहून बोलत आहे, असे बोलून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरे