शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

रिफायनरीप्रकरणी माझी दिशाभूल, केंद्र सरकारला बारसूबाबत दिलेल्या पत्रावर उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

By मनोज मुळ्ये | Updated: May 6, 2023 18:49 IST

सरकारने हा प्रकल्प कसा चांगला आहे, हे मी जसा लोकांमध्ये उभा राहून बोलत आहे, असे बोलून दाखवावे

राजापूर : रिफायनरीच्या दलालांनी अपुरी माहिती देऊन माझी दिशाभूल केली. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प बारसू येथे उभारण्यासंदर्भातील पत्र आपण केंद्र सरकारला धाडले, असे मत ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राजापूर तालुक्यातील बारसू येथे व्यक्त केले.रिफायनरी प्रकल्प प्रस्ताविक असलेल्या बारसू, सोलगावला शनिवारी ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आपण केंद्र सरकारला बारसूबाबत दिलेले पत्र आणि त्यामागची आपली भूमिका यावरच भर दिला. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी मंत्री अनिल परब, रवींद्र वायकर, पक्षाचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे शिवसेना ग्रामस्थांसोबतच आहे आणि जर बारसूतील ग्रामस्थांना रिफायनरी नको असेल तर या प्रकल्पाला ठाकरे शिवसेनाही ठाम विरोध करेल, असे ते म्हणाले.बारसू येथे माती परीक्षणाचे काम सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी विरोध सुरू केला. तेव्हा सत्तेतील शिवसेनेने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र समोर आणले आणि बारसूतील जागा उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला सुचवली असल्याचे ठामपणे सांगितले. केवळ याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या दौऱ्यात विशेष भर दिला. बारसू भागातील जागेत काहीच पीक घेतले जात नाही. प्रकल्पासाठी घेतल्या जाणाऱ्या जागेत कोणी राहतही नाही, असे आपल्याला रिफायनरीच्या दलालांनी सांगितले. त्यामुळे आपण केंद्र सरकारला रिफायनरी प्रकल्पासाठी बारसूची जागा सुचवणारे पत्र दिले.अर्थात लोकांची डोकी फोडून प्रकल्प राबवा, असे आपण सांगितलेले नाही. लोकांची मते विचारात घेऊनच प्रकल्प राबवायला हवा. जर लोकांना हा प्रकल्प नको असेल तर त्याला ठाकरे शिवसेनेचाही ठाम विरोध असेल, असे त्यांनी सांगितले.आपण बारसूच्या जागेसंदर्भात पत्र दिले. पण त्यात आपल्याला अपुरी माहिती देण्यात आली होती. आपला हेतू चांगला होता. म्हणूनच आपण लोकांसमोर ठामपणे उभे राहून आपली भूमिका मांडत आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले आणि सध्याच्या सरकारने हा प्रकल्प कसा चांगला आहे, हे मी जसा लोकांमध्ये उभा राहून बोलत आहे, असे बोलून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरे