शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काही वरिष्ठांमुळे माझा पराभव, योग्यवेळी योग्य निर्णय घेणार; राजन साळवी यांनी भूमिका बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:57 IST

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाला पक्षातीलच काही वरिष्ठ मंडळी जबाबदार आहेत. जर ते शोधून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, ...

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाला पक्षातीलच काही वरिष्ठ मंडळी जबाबदार आहेत. जर ते शोधून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर माझ्यावर जी वेळ आली आहे, तीच इतरांवरही येईल, असे स्पष्ट सांगतानाच माजी आमदार राजन साळवी यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, अशी भूमिकाही प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टपणे मांडली.आपण उद्धवसेनेतच राहणार, अशी भूमिका राजन साळवी यांनी गुरुवारी मांडली होती. मात्र, राजापूर आणि लांजा येथे उद्धवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचे सूतोवाच केले आहे. काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे आपला पराभव झाल्याचे त्यांनी यावेळी नाव न घेता सांगितले.गुरुवारी आपण पत्रकार परिषद घेतल्यानंतर राजापूर येथील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. माझ्यावर अन्याय झाला असल्याचे मत त्यांनी मांडले आणि आपल्याला ठाम भूमिका घेण्याचा आग्रह केला. शुक्रवारी आपण लांजा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनीही हीच भूमिका मांडली. त्यामुळे आपण योग्य वेळी आपण याेग्य निर्णय घेऊ, असे आपण ठरवले असल्याचे साळवी यांनी सांगितले. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू, अशी खात्री आपल्याला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दिली आहे, असेही ते म्हणाले.‘त्यां’च्यावर कारवाई कराकाही वरिष्ठ मंडळी आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आपल्याही मान्य आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी हे लोक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. जर कारवाई झाली नाही तर जी वेळ आपल्यावर आली, तशीच वेळ अन्य कोणावरही येऊ शकते. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी योग्यवेळी निर्णय घ्यायला हवा, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणRajan Salviराजन साळवीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे