शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

काही वरिष्ठांमुळे माझा पराभव, योग्यवेळी योग्य निर्णय घेणार; राजन साळवी यांनी भूमिका बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:57 IST

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाला पक्षातीलच काही वरिष्ठ मंडळी जबाबदार आहेत. जर ते शोधून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, ...

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाला पक्षातीलच काही वरिष्ठ मंडळी जबाबदार आहेत. जर ते शोधून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर माझ्यावर जी वेळ आली आहे, तीच इतरांवरही येईल, असे स्पष्ट सांगतानाच माजी आमदार राजन साळवी यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, अशी भूमिकाही प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टपणे मांडली.आपण उद्धवसेनेतच राहणार, अशी भूमिका राजन साळवी यांनी गुरुवारी मांडली होती. मात्र, राजापूर आणि लांजा येथे उद्धवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचे सूतोवाच केले आहे. काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे आपला पराभव झाल्याचे त्यांनी यावेळी नाव न घेता सांगितले.गुरुवारी आपण पत्रकार परिषद घेतल्यानंतर राजापूर येथील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. माझ्यावर अन्याय झाला असल्याचे मत त्यांनी मांडले आणि आपल्याला ठाम भूमिका घेण्याचा आग्रह केला. शुक्रवारी आपण लांजा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनीही हीच भूमिका मांडली. त्यामुळे आपण योग्य वेळी आपण याेग्य निर्णय घेऊ, असे आपण ठरवले असल्याचे साळवी यांनी सांगितले. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू, अशी खात्री आपल्याला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दिली आहे, असेही ते म्हणाले.‘त्यां’च्यावर कारवाई कराकाही वरिष्ठ मंडळी आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आपल्याही मान्य आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी हे लोक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. जर कारवाई झाली नाही तर जी वेळ आपल्यावर आली, तशीच वेळ अन्य कोणावरही येऊ शकते. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी योग्यवेळी निर्णय घ्यायला हवा, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणRajan Salviराजन साळवीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे