शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

काही वरिष्ठांमुळे माझा पराभव, योग्यवेळी योग्य निर्णय घेणार; राजन साळवी यांनी भूमिका बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:57 IST

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाला पक्षातीलच काही वरिष्ठ मंडळी जबाबदार आहेत. जर ते शोधून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, ...

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाला पक्षातीलच काही वरिष्ठ मंडळी जबाबदार आहेत. जर ते शोधून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर माझ्यावर जी वेळ आली आहे, तीच इतरांवरही येईल, असे स्पष्ट सांगतानाच माजी आमदार राजन साळवी यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, अशी भूमिकाही प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टपणे मांडली.आपण उद्धवसेनेतच राहणार, अशी भूमिका राजन साळवी यांनी गुरुवारी मांडली होती. मात्र, राजापूर आणि लांजा येथे उद्धवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचे सूतोवाच केले आहे. काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे आपला पराभव झाल्याचे त्यांनी यावेळी नाव न घेता सांगितले.गुरुवारी आपण पत्रकार परिषद घेतल्यानंतर राजापूर येथील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. माझ्यावर अन्याय झाला असल्याचे मत त्यांनी मांडले आणि आपल्याला ठाम भूमिका घेण्याचा आग्रह केला. शुक्रवारी आपण लांजा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनीही हीच भूमिका मांडली. त्यामुळे आपण योग्य वेळी आपण याेग्य निर्णय घेऊ, असे आपण ठरवले असल्याचे साळवी यांनी सांगितले. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू, अशी खात्री आपल्याला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दिली आहे, असेही ते म्हणाले.‘त्यां’च्यावर कारवाई कराकाही वरिष्ठ मंडळी आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आपल्याही मान्य आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी हे लोक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. जर कारवाई झाली नाही तर जी वेळ आपल्यावर आली, तशीच वेळ अन्य कोणावरही येऊ शकते. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी योग्यवेळी निर्णय घ्यायला हवा, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणRajan Salviराजन साळवीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे