शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

दापाेलीतील 'त्या' तीन वृध्द महिलांचा दागिन्यांसाठीच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 16:59 IST

मृत तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे.

दापोली : तालुक्यातील वणौशी खोतवाडीत दोन सवती आणि अन्य एक महिला अशा तिघींचा संशयास्पद मृत्यू झाला. या तिघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पार्वती परबत पाटणे (वय ९०), सत्यवती परबत पाटणे (८०) तसेच इंदुबाई शांताराम पाटणे (८०) अशी या तिघींची नावे आहेत. त्यांच्या गळ्यातील दीड लाखाचे दागिने गायब असल्याने दागिन्यांसाठीच या तिघींचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे.दापाेली पाेलिसांनी याबाबत चाेरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे. सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्या डाेक्यात प्रहार करुन नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा पाेलिसांना अंदाज आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी शशिकिरण काशीद हे करत आहेत.पार्वती आणि सत्यवती या सवती होत्या. इंदुबाई या त्यांच्या जाऊ शेजारच्या घरात राहत होत्या. या तिन्ही वयोवृद्ध महिला रात्री नेहमी एकत्र झोपत असत. नेहमीप्रमाणे त्या गुरुवारी एकत्र झोपल्या. परंतु सकाळी हा दुर्दैवी प्रकार उघड झाला. हा प्रकार नेमका रात्री घडला की, सकाळी घडला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पार्वती व सत्यवती या दोघींनाही मूलबाळ नसल्याने त्यांचा पुतण्या त्यांचा सांभाळ करत होता. शेजारीच असणाऱ्या इंदुबाई पाटणे यांचा मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो. त्याही घरी एकट्या असत. त्यामुळे त्या झोपण्यासाठी पार्वती, सत्यवतीकडे जात असत. तीन महिलांचा एकाच ठिकाणी खून झाल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यादृष्टीने पाेलीस तपास सुरु आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीCrime Newsगुन्हेगारी