शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दापाेलीतील 'त्या' तीन वृध्द महिलांचा दागिन्यांसाठीच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 16:59 IST

मृत तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे.

दापोली : तालुक्यातील वणौशी खोतवाडीत दोन सवती आणि अन्य एक महिला अशा तिघींचा संशयास्पद मृत्यू झाला. या तिघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पार्वती परबत पाटणे (वय ९०), सत्यवती परबत पाटणे (८०) तसेच इंदुबाई शांताराम पाटणे (८०) अशी या तिघींची नावे आहेत. त्यांच्या गळ्यातील दीड लाखाचे दागिने गायब असल्याने दागिन्यांसाठीच या तिघींचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे.दापाेली पाेलिसांनी याबाबत चाेरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे. सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्या डाेक्यात प्रहार करुन नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा पाेलिसांना अंदाज आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी शशिकिरण काशीद हे करत आहेत.पार्वती आणि सत्यवती या सवती होत्या. इंदुबाई या त्यांच्या जाऊ शेजारच्या घरात राहत होत्या. या तिन्ही वयोवृद्ध महिला रात्री नेहमी एकत्र झोपत असत. नेहमीप्रमाणे त्या गुरुवारी एकत्र झोपल्या. परंतु सकाळी हा दुर्दैवी प्रकार उघड झाला. हा प्रकार नेमका रात्री घडला की, सकाळी घडला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पार्वती व सत्यवती या दोघींनाही मूलबाळ नसल्याने त्यांचा पुतण्या त्यांचा सांभाळ करत होता. शेजारीच असणाऱ्या इंदुबाई पाटणे यांचा मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो. त्याही घरी एकट्या असत. त्यामुळे त्या झोपण्यासाठी पार्वती, सत्यवतीकडे जात असत. तीन महिलांचा एकाच ठिकाणी खून झाल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यादृष्टीने पाेलीस तपास सुरु आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीCrime Newsगुन्हेगारी