शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

ओवळीतील वादळग्रस्तांच्या मदतीला धावले मुंबईकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील ओवळी येथील कातवडी वस्तीला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. वाऱ्याच्या जोराने घरावरील पत्रे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील ओवळी येथील कातवडी वस्तीला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. वाऱ्याच्या जोराने घरावरील पत्रे उडून गेले होते. पावसाळा तोंडावर आला तरी परिस्थितीअभावी त्यांना घरावर पत्रे टाकता आले नाहीत. याची दखल घेत मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयातील १९८३च्या दहावी बॅचमधील विद्यार्थी कातकरी लोकांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी प्रथम नुकसानग्रस्तांच्या घरांची पाहणी करत आवश्यक असलेले पत्रे, लोखंडी पाईप व आवश्यक ते सर्व साहित्य मोफत दिले आहे.

मुंबई दादर येथील आई. ई. एस. गर्ल्स स्कूल राजा शिवाजी विद्यालयाचे १९८३ बॅचचे विद्यार्थी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संघटित झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या महापुरातही या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून लाखोंची मदत केली होती. या माजी विद्यार्थ्यांमध्ये कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मुंबई तसेच विविध ठिकाणच्या लोकांचा समावेश आहे. तालुक्यातील ओवळी तसेच कोळकेवाडी धनगरवाडी येथे तौक्ते चक्रीवादळात सामान्य व गरजू कुटुंबांना फटका बसल्याची माहिती राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ओवळी येथील नंदा निकम, रामचंद्र निकम, संजय पवार, गीता पवार, शेवंती पवार, विष्णू निकम या कातकरी वाडीतील लोकांच्या नुकसानाची पाहणी केली. ग्रुपचे जितेंद्र खानविलकर, सचिन शिंदे, किरण शिंदे, राजेश चाळके, संजय जगदाळे, विजय शिगवण यांनी कातकरी वस्तीमधील नुकसान झालेल्या घरांची पाहणी करत आवश्यक वस्तूंंची यादी केली. त्यानुसार छत दुरूस्तीसाठी लागणारे, पत्रे, लोखंडी पाईप, खिळे आदी सर्व साहित्य एका ट्रकमध्ये घेऊन ते ओवळीत पोहोच केले.

यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्याने कातकरी बांधवांनी समाधानाची भावना व्यक्त केली. या मदतकार्यात ग्रुपचे अध्यक्ष माधवी गवाणकर, मनोज मुळ्ये, डॉ. अश्‍विन सावंत, अमोघ मथुरे यांनी मेहनत घेतली. हे साहित्य देताना ओवळीच्या सरपंच शेवंती पवार, उपसरपंच दिनेश शिंदे, सदस्य केशव कदम, निकीता शिंदे, संपदा बोलाडे, माधवी शिंदे, दीपिका शिंदे, ग्रामविकास अधिकारी मंगेश पिंगळे यांच्यासह ग्रुपचे सदस्य व नुकसानग्रस्त कातकरी बांधव उपस्थित होते.