शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दोन वेळा कंत्राटदार बदलूनही मुंबई-गोवा महामार्ग रखडला; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 07:45 IST

तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे झाला.

पनवेल / अलिबाग / रत्नागिरी: मुंबई-गोवामहामार्गाच्या रुंदीकरणाबाबत दोन कंत्राटदार बदलावे लागले. सन २०११ मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच दिलेल्या  संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आठ वर्षांच्या कार्यकाळात अधिकारी बदलले, कंत्राटदार बदलले, त्यामुळे मुंबई-गोवामहामार्ग रखडला, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच आता मी या खात्यावर कायम असल्याने येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे झाला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या रखडलेल्या मार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मी स्वतः कंत्राटदार जे. एम. म्हात्रे यांच्या मागे लागलो, त्यानंतर त्यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. पळस्पे ते इंदापूर महामार्गही डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असे गडकरींनी सांगितले.  यावेळी गडकरी यांनी १३ हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ १२ तासांपर्यंत कमी करेल.  

कार्यक्रमाप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठठाकूर,जे. एम. म्हात्रे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता एस शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसीलदार विजय तळेकर, पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे आदी उपस्थित होते.

महामार्गावर टोल नकोच आजवर या मार्गावर हजारोंना जीव गमवावा लागला. या मृतांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायची असेल तर या मार्गावर टोल नाके नको, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केली.

उपग्रहावर आधारित टोल वसुलीमहामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे. यामुळे टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत, अशी  माहिती गडकरी यांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवाRatnagiriरत्नागिरी