शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 11:59 IST

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला असून दापोली-खेड हा मार्ग बंद झाला तर मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सकाळी  ७.१० वाजताच गाठल्याने सकाळी  ९.३०  वाजल्यापासून रस्ता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देजगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंदरस्ता वाहून गेल्याने मार्ग बंद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला असून दापोली-खेड हा मार्ग बंद झाला तर मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सकाळी  ७.१० वाजताच गाठल्याने सकाळी  ९.३०  वाजल्यापासून रस्ता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.

मुसळधार पावसामुळे चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.  

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारीही जोरदार फटका बसला. मुसळधार पावसामुळे चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेला पाऊस आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात पडणारा पाऊस यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढली आहे. सह्याद्री खोऱ्यातील  ३२ गावात मुसळधार पाऊस सुरू असून त्यांचा जनसंपर्क कुठला आहे.

सकाळी नऊ वाजल्यापासूनच चिपळूण शहरात पाणी वाढू लागले.

सकाळी नऊ वाजल्यापासूनच चिपळूण शहरात पाणी वाढू लागले. चिपळूण बाजार पुलावरून पाणी वाहू लागले आहे ते दाखवणे महामार्गावरील सेनगाव पाण्यात आलेले आहे. प्रथम बाजारपेठ भाग आणि त्यानंतर चिंचनाका भाग पाण्याखाली गेला. शहरातील मुख्य बस स्थानकादरम्यानही ढोपरभर पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. चिपळूण तालुक्यातील कालुस्ते येथे दरड कोसळून दहा घराःंना धोका निर्माण झाला आहे.

रत्नागिरी-गुहागर भातगाव मार्गे वाहतूक बंद झाली आहे. चिपळूणप्रमाणेच खेडलाही पावसाचा फटका बसला आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील मच्छीमार्केटही पाण्याखाली गेले आहे. जगबुडी नदीचे पाणी ७ मीटरपर्यंत वाढल्यानंतर धोक्याची सूचना दिली जाते. आता पाणी आठ मीटरपर्यंत वाढले आहे.

रस्त्यावर मोठे दगड व दरड कोसळल्याने तसेच पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद  झाला आहे. रत्नागिरी-गुहागर भातगाव मार्गे वाहतूक बंद झाली आहे. रस्त्यावर मोठे दगड व दरड कोसळल्याने तसेच पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद  झाला आहे. गुहागर-भातगाव-रत्नागिरी मार्ग मेढे तर्फे फुणगुस येथे मोठी दगड व दरड कोसळल्याने तसेच रस्ता वाहून गेल्याने मार्ग बंद झाला आहे.

दापोली-खेड हा मार्ग बंद आवाशी गावात नवीन पूल सुरक्षित असून देऊळ वाणी आवाशी देऊळवाडीकडे जाणारा पूल तुटला आहे, त्याचे सध्या बांधकाम सुरू होते. रात्रीपासून पावसात पाऊस सुरू असून नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहेत. दस्तुरी-साखरोळी दापोली मार्गावर पानी आले असून दस्तुरी येलवली नदीला पूर आला आहे. यामुळे सॉ मिल व बेघर वसाहतमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी