महावितरणपुढे ३६ कोटींच्या वसुलीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:55+5:302021-04-24T04:31:55+5:30
रत्नागिरी : वीज बिल वसुलीमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी लॉकडाऊनपासून थकबाकी वाढतच आहे. थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने ...

महावितरणपुढे ३६ कोटींच्या वसुलीचे आव्हान
रत्नागिरी : वीज बिल वसुलीमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी लॉकडाऊनपासून थकबाकी वाढतच आहे. थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने महावितरणपुढे वसुलीचे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील एक लाख ३० हजार ४१७ ग्राहकांकडे ३६ कोटी २ लाख ५६ हजार रुपयांची थकबाकी अद्याप शिल्लक आहे.
जिल्ह्यातील एक लाख ६ हजार ५१० घरगुती ग्राहकांनी वीज बिले न भरल्यामुळे ६ कोटी ८२ लाख १५ हजार, वाणिज्यिकच्या १२ हजार ७७ ग्राहकांकडे ५ कोटी ८० लाख ७ हजार, औद्योगिकच्या ११६६ ग्राहकांकडे ३ कोटी २५ लाख ३३ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. कृषीच्या ४३०५ ग्राहकांकडे ४२ लाख २ हजार, पथदीपच्या १३६५ ग्राहकांकडे ८ कोटी १८ लाख ८७ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ८५८ ग्राहकांकडे १ कोटी ६४ लाख ५१ हजार रुपये शिल्लक आहेत. सार्वजनिक सेवेंतर्गत २२८६ ग्राहकांकडे ९७ लाख ७२ हजार रुपये, इतर १८५० ग्राहकांकडे ८६ लाख २ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे.
चिपळूण विभागातील घरगुती २७ हजार ७५२ ग्राहकांकडे ४ कोटी ४६ लाख ९१ हजार, वाणिज्यिकच्या ३३६७ ग्राहकांकडे एक कोटी ९० लाख ६० हजार, औद्योगिकच्या ३४७ ग्राहकांकडे ९७ लाख ४७ तसेच कृषी, पथदीप, सार्वजनिक सेवा, पाणीपुरवठा विभाग व इतर मिळून एकूण ३३ हजार ६५९ ग्राहकांकडे ९ कोटी ८२ लाख १२ हजार रूपयांची थकबाकी शिल्लक आहे.
खेड विभागातील ३० हजार ४५ घरगुती ग्राहकांकडे ३ कोटी ५८ हजार ९६, वाणिज्यिकच्या २९६८ ग्राहकांकडे १ कोटी २४ लाख ८ हजार, औद्योगिकच्या २९६ ग्राहकांकडे ६६ लाख १२ हजार तसेच अन्य सर्व ग्राहक मिळून एकत्रित ३५ हजार ९१७ ग्राहकांकडे ९ कोटी ११ लाख ५६ हजार रूपयांची थकबाकी शिल्लक आहे.
रत्नागिरी विभागातील ४८ हजार ७१३ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ८२ लाख १५ हजार, वाणिज्यिकच्या ५७४२ ग्राहकांकडे २ कोटी ६५ लाख ३९ हजार, औद्योगिकच्या ५२३ ग्राहकांकडे एक कोटी ६१ लाख ७४ हजार तसेच अन्य सर्व ग्राहकांची मिळून एकूण ६० हजार ८४१ ग्राहकांकडे १७ कोटी ८ लाख ८९ हजार रुपयांची थकबाकी आहे.
.................................
कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे वसुलीसाठी पथक बाहेर पडणे अशक्य आहे. ग्राहकांनी स्वत:च वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. घराबाहेर पडणे अशक्य असल्याने ऑनलाईन किंवा मोबाईल अॅपचा वापर ग्राहकांनी करावा.
- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.