शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न

By अरुण आडिवरेकर | Updated: August 25, 2022 17:20 IST

महामार्गाचे अपूर्ण काम आणि खड्ड्यांमुळे गावी येताना जीव मुठीत घेऊनच यावे लागणार

अरुण आडिवरेकररत्नागिरी : गेली दाेन वर्ष काेराेनाच्या भीतीमुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांच्या मनात भीती हाेती. अनेकजण जीव मुठीत घेऊनच गावी आले हाेते. यावर्षी काेराेनाचे प्रमाण कमी, त्यातच काेणतेही निर्बंध नसल्याने मुंबईकर माेठ्या प्रमाणात गावी येणार आहेत. मात्र, महामार्गाचे अपूर्ण काम आणि खड्ड्यांमुळे गावी येताना जीव मुठीत घेऊनच यावे लागणार आहे.यावर्षी काेराेनाची रुग्णसंख्या कमी आहे. त्यातच शासनाने उत्सवावरील निर्बंध उठविल्याने गणेशाेत्सव दणक्यात साजरा हाेणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मुंबईकर माेठ्या प्रमाणात गावी येणार आहेत. मात्र, गावी येताना मुंबईकरांना महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. वेळेत घरी पाेहाेचण्यासाठी लवकरच निघावे लागणार आहे.

कशेडी घाटातील भुयारी बाेगद्याचे काम अर्धवट स्थितीतजिल्ह्याची सीमा सुरु हाेणाऱ्या कशेडी घाटातील भुयारी बाेगद्याचे काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. दाेनपैकी एकच बाेगदा पूर्ण खाेदून झाला आहे. मात्र, अंतर्गत काम अजूनही झालेली नाही. या भागात खड्डे पडल्याने जिल्ह्याच्या हद्दीतच खड्ड्यांनी स्वागत हाेणार आहे. तालुक्यात ४४ किलाेमीटरच्या भागात ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, असगणी फाटा येथील ओव्हर ब्रीजचे काम अर्धवट आहे.

परशुराम घाटात काम रखडलेलेचिपळूण तालुक्यात कापसाळ, कामथे, वालाेपे, परशुराम घाट आणि सावर्डे या भागात खड्ड्यांमुळे जीव मेटाकुटीला येताे. शहरातील पाॅवर हाऊस, बहाद्दूरशेख नाका, परशीतिठा हा भागही खड्डेमय झाला आहे. कामथे, परशुराम घाटात काम रखडलेले आहे. शहरातील उड्डाणपुलाच्या ४५ पैकी केवळ १३ पिलरचे काम झाले आहे. उर्वरीत काम अर्धवटच आहे. दाेन किलाेमीटरचा सर्व्हीस राेडही खड्डेमय आहे.

संगमेश्वर तालुक्यातील तीन पुलांची कामे रखडलेलीसंगमेश्वर तालुक्यातील धामणी, तुरळ, कुरधुंडा, वांद्री, आरवली या भागात खड्डेच खड्डे आहेत. या मार्गावरील माेऱ्यांवर डांबरीकरण न झाल्याने वाहन चालविणे मुश्किल झाले आहे. साेनवी पुलाचे तीन पिलर अर्धवट स्थितीत आहेत. शास्त्रीनदीवरील पुलाचा जाेडरस्ता झालेला नाही तर मानसकाेंड येथील पूल रखडलेलाच आहे.

राजापूर तालुक्यात मात्र, बहुतांशी काम पूर्णलांजा तालुक्यातील देवधेपासून वाकेडपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना सांभाळूनच यावे लागणार आहे. शहरात नळपाणी याेजनेमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. राजापूर तालुक्यात मात्र, बहुतांशी काम पूर्ण झाले असून, एसटी बस स्थानक, काेदवलीत ५०० मीटर आणि हातिवलेतील ५०० मीटरचा भाग वगळता काॅंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातील प्रवासात खड्ड्यांचा त्रास कमी हाेणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सवroad transportरस्ते वाहतूक