शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सुसाट; पण पावसाळ्यात धोका कायम

By संदीप बांद्रे | Updated: May 4, 2024 15:57 IST

धोकादायक दरडींच्या ठिकाणी उपाययोजना करण्याची आवश्यकता

संदीप बांद्रेचिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्णत्वास गेले आहे. आता घाटातून प्रवास करताना वाहनांचा वेगही वाढला आहे; मात्र अजूनही घाटातील दरड प्रणव क्षेत्रात धोका टळलेला नाही. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे कामही अजून अपूर्ण आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात घाटातील सुरक्षितता समाेर येणार आहे.महामार्ग चौपदरीकरणात परशुराम घाटातील काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले. चौपदरीकरणातील जमिनीच्या मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा आजतागायत सुटलेला नाही. सुरुवातीला प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नव्हता; मात्र त्यानंतर अत्यंत घाईघाईने काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचे परिणाम मागील वर्षी पहिल्याच पावसात दिसले. अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाचा भाग खचला हाेता. विशेषतः घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. त्या ठिकाणी नव्याने काँक्रीटीकरणाचे काही महिन्यांपूर्वीच पूर्ण केले.या घाटातील अतिशय अवघड टप्पा चिपळूण हद्दीत, उर्वरित भाग महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हद्दीत येतो. महाड हद्दीत कल्याण टोलवेज कंपनीकडून सुरू असलेल्या कामावर अखेरचा हात फिरवला असला, तरी त्या ठिकाणी अजूनही किरकोळ स्वरूपाची कामे शिल्लक आहेत; मात्र चिपळूण हद्दीत काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असले, तरी या ठिकाणी दरडीची उंची अधिक असल्याने तेथे पायरी पद्धतीने रचना करण्याची मागणी केली जात आहे.तूर्तास दरडीचा धोकाही कायम आहे; मात्र आता संबंधित कंपनीने चिपळुणातील यंत्रणा संगमेश्वर हद्दीतील कामात गुंतल्याने परशुराम घाटातील कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी काही महत्त्वाच्या उपाययोजना न केल्यास यावर्षीही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार आहे; तसेच पायथ्यालागतच्या घरांचाही धोका टळलेला नाही. आता दोन्ही मार्गांवर वाहतूक सुसाट सुरू झाली असली, तरी दरडीची उंची लक्षात घेता दोन्ही मार्गांवरील धोका टळल्याची खात्री अजून तरी ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेली नाही.

अजूनही महाड हद्दीत किरकोळ काम शिल्लक असून पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल; मात्र दरडीचे टप्पे तयार करण्यासाठी जागा अपुरी आहे. त्यामुळे काम थांबले आहे. मात्र, त्या ठिकाणची गटारातील माती व अन्य साफसफाई तातडीने केली जाणार आहे. - आर. पी. कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग