शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

यंदा कर्तव्य आहे! लग्नाचा धुमधडाका जोरात, महिन्यांनुसार मुहूर्ताची तारीख..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:39 IST

रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. ...

रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. यावर्षी लग्नाचे एकूण ६६ मुहूर्त असले तरी मे महिन्यात अवघे दोनच मुहूर्त आहेत. त्यानंतर जूनमध्ये शेवटचे दोन दिवस मुहूर्त आहेत तर जुलैमध्ये काही मुहूर्तच नाहीत. त्यामुळे यंदा कर्तव्य असणाऱ्यांना घाई करावी लागणार आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचे अधिकाधिक मुहूर्तावर लग्नगाठ बांधण्यासाठी घाई करावी लागणार आहे.वास्तविक दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर सुटीच्या दिवसात मे महिन्यातील १ व २ तारखेला मुहूर्त आहेत. त्यानंतर जूनच्या २९ व ३० तारखेलाच मुहूर्त आहेत. मे महिन्यात पाण्याची भासणारी टंचाई यामुळे सुटीतील मुहूर्तापेक्षा लवकरचा मुहूर्त शोधला जात आहे. शहरात तर सभागृहाच्या उपलब्धतेवर मुहूर्त ठरत आहे. सोमवारपासून विवाह मुहूर्त सुरू होत असून, हिवाळ्यात ३८ मुहूर्त तर उन्हाळ्यात २८ मुहूर्त आहेत.

असे आहेत विवाह मुहूर्तनोव्हेंबर - २७, २८, २९डिसेंबर - ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१जानेवारी - २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७, २८, ३०, ३१फेब्रुवारी - १, २, ४, ६, १२, १३, १७, १८, २४, २६, २७, २८, २९मार्च - ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०एप्रिल - १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८मे - १, २जून - २९, ३०जुलै - ९, ११, १२, १३, १४, १५

यावर्षी एकूण ६६ विवाह मुहूर्त आहेत

  • हिवाळ्यामध्ये ३८ मुहूर्त आहेत.
  • उन्हाळ्यात २८ विवाह मुहूर्त आहेत.
  • मे महिन्याच्या सुरुवातीला दोन तर जूनमध्ये शेवटचे दोन दिवस मुहूर्त आहेत.

मुलींपेक्षा मुलांच्या विवाहाची अधिक चिंता

  • मुलींच्या वाढत्या जन्मदरामुळे मुलींपेक्षा आता मुलांच्याच विवाहाची चिंता मुलांच्या कुटुंबांमध्ये वाढली आहे. तुलनेने मुलांची संख्या मुलींपेक्षा कमी आहे.
  • शिक्षणाचा टक्का मुलींमध्येही वाढला आहे. त्यामुळे शिक्षणातील बरोबरी/ त्यापेक्षा अधिक शोधली जाते. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • शिक्षणाबरोबर शहरी भागातील मुलांना पसंती असल्याने ग्रामीण भागातील मुलांना मुली मिळत नसल्याने मुलांच्या लग्नाचे वय निघून जात आहे.
  • याेग्य जोडीदार न मिळाल्याने मुलांचे लग्नाचे वय निघून जाते. त्यामुळे येणाऱ्या नैराश्यातून युवक व्यवसनाधीन होत चालल्याने नवी समस्या उभी राहिली आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी निश्चितच मुहूर्त अधिक आहेत. यावर्षीच्या विवाह मुहूर्तामध्ये गुरू, शुक्राचा अस्त नसल्यामुळे प्रत्येक महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. मात्र, तरीही गुरुबल व चंद्रबल पाहूनच विवाहाच्या तारखा ठरविल्या जात आहेत. सध्या हिवाळ्यातील विवाह मुहूर्त ठरविण्याकडे यजमान मंडळींचा कल वाढला आहे. - अजय जोशी, पुराेहित

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmarriageलग्न