शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

यंदा कर्तव्य आहे! लग्नाचा धुमधडाका जोरात, महिन्यांनुसार मुहूर्ताची तारीख..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:39 IST

रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. ...

रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. यावर्षी लग्नाचे एकूण ६६ मुहूर्त असले तरी मे महिन्यात अवघे दोनच मुहूर्त आहेत. त्यानंतर जूनमध्ये शेवटचे दोन दिवस मुहूर्त आहेत तर जुलैमध्ये काही मुहूर्तच नाहीत. त्यामुळे यंदा कर्तव्य असणाऱ्यांना घाई करावी लागणार आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचे अधिकाधिक मुहूर्तावर लग्नगाठ बांधण्यासाठी घाई करावी लागणार आहे.वास्तविक दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर सुटीच्या दिवसात मे महिन्यातील १ व २ तारखेला मुहूर्त आहेत. त्यानंतर जूनच्या २९ व ३० तारखेलाच मुहूर्त आहेत. मे महिन्यात पाण्याची भासणारी टंचाई यामुळे सुटीतील मुहूर्तापेक्षा लवकरचा मुहूर्त शोधला जात आहे. शहरात तर सभागृहाच्या उपलब्धतेवर मुहूर्त ठरत आहे. सोमवारपासून विवाह मुहूर्त सुरू होत असून, हिवाळ्यात ३८ मुहूर्त तर उन्हाळ्यात २८ मुहूर्त आहेत.

असे आहेत विवाह मुहूर्तनोव्हेंबर - २७, २८, २९डिसेंबर - ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१जानेवारी - २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७, २८, ३०, ३१फेब्रुवारी - १, २, ४, ६, १२, १३, १७, १८, २४, २६, २७, २८, २९मार्च - ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०एप्रिल - १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८मे - १, २जून - २९, ३०जुलै - ९, ११, १२, १३, १४, १५

यावर्षी एकूण ६६ विवाह मुहूर्त आहेत

  • हिवाळ्यामध्ये ३८ मुहूर्त आहेत.
  • उन्हाळ्यात २८ विवाह मुहूर्त आहेत.
  • मे महिन्याच्या सुरुवातीला दोन तर जूनमध्ये शेवटचे दोन दिवस मुहूर्त आहेत.

मुलींपेक्षा मुलांच्या विवाहाची अधिक चिंता

  • मुलींच्या वाढत्या जन्मदरामुळे मुलींपेक्षा आता मुलांच्याच विवाहाची चिंता मुलांच्या कुटुंबांमध्ये वाढली आहे. तुलनेने मुलांची संख्या मुलींपेक्षा कमी आहे.
  • शिक्षणाचा टक्का मुलींमध्येही वाढला आहे. त्यामुळे शिक्षणातील बरोबरी/ त्यापेक्षा अधिक शोधली जाते. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • शिक्षणाबरोबर शहरी भागातील मुलांना पसंती असल्याने ग्रामीण भागातील मुलांना मुली मिळत नसल्याने मुलांच्या लग्नाचे वय निघून जात आहे.
  • याेग्य जोडीदार न मिळाल्याने मुलांचे लग्नाचे वय निघून जाते. त्यामुळे येणाऱ्या नैराश्यातून युवक व्यवसनाधीन होत चालल्याने नवी समस्या उभी राहिली आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी निश्चितच मुहूर्त अधिक आहेत. यावर्षीच्या विवाह मुहूर्तामध्ये गुरू, शुक्राचा अस्त नसल्यामुळे प्रत्येक महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. मात्र, तरीही गुरुबल व चंद्रबल पाहूनच विवाहाच्या तारखा ठरविल्या जात आहेत. सध्या हिवाळ्यातील विवाह मुहूर्त ठरविण्याकडे यजमान मंडळींचा कल वाढला आहे. - अजय जोशी, पुराेहित

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmarriageलग्न