शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कर्तव्य आहे! लग्नाचा धुमधडाका जोरात, महिन्यांनुसार मुहूर्ताची तारीख..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:39 IST

रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. ...

रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. यावर्षी लग्नाचे एकूण ६६ मुहूर्त असले तरी मे महिन्यात अवघे दोनच मुहूर्त आहेत. त्यानंतर जूनमध्ये शेवटचे दोन दिवस मुहूर्त आहेत तर जुलैमध्ये काही मुहूर्तच नाहीत. त्यामुळे यंदा कर्तव्य असणाऱ्यांना घाई करावी लागणार आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचे अधिकाधिक मुहूर्तावर लग्नगाठ बांधण्यासाठी घाई करावी लागणार आहे.वास्तविक दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर सुटीच्या दिवसात मे महिन्यातील १ व २ तारखेला मुहूर्त आहेत. त्यानंतर जूनच्या २९ व ३० तारखेलाच मुहूर्त आहेत. मे महिन्यात पाण्याची भासणारी टंचाई यामुळे सुटीतील मुहूर्तापेक्षा लवकरचा मुहूर्त शोधला जात आहे. शहरात तर सभागृहाच्या उपलब्धतेवर मुहूर्त ठरत आहे. सोमवारपासून विवाह मुहूर्त सुरू होत असून, हिवाळ्यात ३८ मुहूर्त तर उन्हाळ्यात २८ मुहूर्त आहेत.

असे आहेत विवाह मुहूर्तनोव्हेंबर - २७, २८, २९डिसेंबर - ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१जानेवारी - २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७, २८, ३०, ३१फेब्रुवारी - १, २, ४, ६, १२, १३, १७, १८, २४, २६, २७, २८, २९मार्च - ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०एप्रिल - १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८मे - १, २जून - २९, ३०जुलै - ९, ११, १२, १३, १४, १५

यावर्षी एकूण ६६ विवाह मुहूर्त आहेत

  • हिवाळ्यामध्ये ३८ मुहूर्त आहेत.
  • उन्हाळ्यात २८ विवाह मुहूर्त आहेत.
  • मे महिन्याच्या सुरुवातीला दोन तर जूनमध्ये शेवटचे दोन दिवस मुहूर्त आहेत.

मुलींपेक्षा मुलांच्या विवाहाची अधिक चिंता

  • मुलींच्या वाढत्या जन्मदरामुळे मुलींपेक्षा आता मुलांच्याच विवाहाची चिंता मुलांच्या कुटुंबांमध्ये वाढली आहे. तुलनेने मुलांची संख्या मुलींपेक्षा कमी आहे.
  • शिक्षणाचा टक्का मुलींमध्येही वाढला आहे. त्यामुळे शिक्षणातील बरोबरी/ त्यापेक्षा अधिक शोधली जाते. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • शिक्षणाबरोबर शहरी भागातील मुलांना पसंती असल्याने ग्रामीण भागातील मुलांना मुली मिळत नसल्याने मुलांच्या लग्नाचे वय निघून जात आहे.
  • याेग्य जोडीदार न मिळाल्याने मुलांचे लग्नाचे वय निघून जाते. त्यामुळे येणाऱ्या नैराश्यातून युवक व्यवसनाधीन होत चालल्याने नवी समस्या उभी राहिली आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी निश्चितच मुहूर्त अधिक आहेत. यावर्षीच्या विवाह मुहूर्तामध्ये गुरू, शुक्राचा अस्त नसल्यामुळे प्रत्येक महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. मात्र, तरीही गुरुबल व चंद्रबल पाहूनच विवाहाच्या तारखा ठरविल्या जात आहेत. सध्या हिवाळ्यातील विवाह मुहूर्त ठरविण्याकडे यजमान मंडळींचा कल वाढला आहे. - अजय जोशी, पुराेहित

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmarriageलग्न