शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आमदार राजन साळवींनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, चर्चा रंगल्या; पण..

By अरुण आडिवरेकर | Updated: February 29, 2024 19:08 IST

रत्नागिरी : राज्यातील राजकीय गणित विस्कटलेली असल्याने हल्ली काेणी काेणाला भेटले की साऱ्यांच्या भुवया उंचावल्या जातात. आमदार राजन साळवी ...

रत्नागिरी : राज्यातील राजकीय गणित विस्कटलेली असल्याने हल्ली काेणी काेणाला भेटले की साऱ्यांच्या भुवया उंचावल्या जातात. आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने आमदार साळवी उपमुख्यंत्री पवार यांच्या भेटीला का गेले याबाबत अधिवेशन काळातच चर्चा रंगली. मात्र, ही भेट जयगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनाबाबत असल्याचे कळताच भेटीची चर्चा थंडावली.

जयगड (ता. रत्नागिरी) येथील किल्ल्याचा बुरुज आणि तटाला या भागात हाेणाऱ्या कंपनीच्या ड्रेझिंगमुळे तडे गेले आहेत. या प्रकाराची दखल प्रशासनाने घेऊन तहसीलदार तसेच पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या पाहणी तटाला व बुरुजाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर आमदार राजन साळवी यांनीही जयगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत त्यांनी किल्ल्याच्या दुरावस्थेबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडू असे सांगितले.

अधिवेशन काळात आमदार राजन साळवी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात गेले आणि साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. आमदार साळवी नेमके कशासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीला गेले याची चर्चा रंगू लागली. आमदार साळवी दालनातून बाहेर येईपर्यंत तर्कवितर्क लढविले जात हाेते. बऱ्याच वेळाने आमदार साळवी दालनाबाहेर आले आणि त्यांनी जयगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी ही भेट घेतल्याचे समाेर आले. त्यानंतर रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीAjit Pawarअजित पवार